शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

शिक्षकाची नाेकरी नकाे रे बाबा; डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:35 IST

बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षकभरतीच हाेत नसल्याने डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील १६६० जागांसाठी केवळ ...

बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षकभरतीच हाेत नसल्याने डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील १६६० जागांसाठी केवळ ३५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तब्बल १३०४ जागा रिक्त राहणार असल्याने अनेक अध्यापक विद्यालये ओस पडणार आहेत.

डीएड, बीएड महाविद्यालयांना माेठ्या प्रमाणात मंजुरी दिल्याने गत काही वर्षांत पदवी, पदविका मिळवणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. पदवी मिळवणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी शासनाने शिक्षक भरतीला परवानगी दिली नाही. त्यातच टीईटी उत्तीर्णची अट असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीही माेठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या हाेत्या. विद्यार्थीच मिळत नसल्याने अनेक अध्यापक विद्यालये बंद हाेण्याच्या मार्गावर आहेत़

जिल्ह्यातील एकूण डीएड काॅलेज

२९

एकूण जागा

१६६०

झालेले प्रवेश

३५६

नाेकरीची हमी नाही

शिक्षक भरतीवर गत काही वर्षांपासून बंदी घालण्यात आली हाेती. त्यातच पवित्र पाेर्टलवरून भरती सुरू करण्यात आली असून त्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट आहे.

जिल्ह्यात आधीच माेठ्या प्रमाणात डीएड आणि बीएड धारक विद्यार्थी बेराेजगार आहेत.

डीएड केल्यानंतर राेजगार मिळेलच याची शाश्वाती नाही. त्यामुळे विद्यार्थी डीएडला प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे.

विद्यार्थी म्हणतात...

गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नाही. आधीच अनेक विद्यार्थी बेराेजगार असताना शासनाने टीईटी, टेट परीक्षेची अट लादली आहे. त्यामुळे, डीएड न करता बीएला प्रवेश घेतला आहे़

-प्रथमेश लाेखंडे, विद्यार्थी

शिक्षक भरती बंद असल्याने अनेक डीएड, बीएडधारक बेराेजगार झालेले आहेत. त्यातच सीईटी, टेट परीक्षा देऊनही राेजगार मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे डीएडला प्रवेश घेतला नाही़

-परीक्षित राठाेड, विद्यार्थी

शिक्षक भरती बंद असल्याचा परिणाम

सन २०१० पासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही आता टीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण हाेण्याची अट ठेवण्यात आली आहे़ त्यामुळे, डीएड, बीएडकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. यावर्षीही खूप कमी अर्ज आलेले आहेत़

-डाॅ. विजयकुमार शिंदे, प्राचार्य डायट

डीएड, बीएडची पदवी घेऊन बेराेजगार हाेणाऱ्याची संख्या अलीकडे माेठ्या प्रमाणात वाढली आहे. पदवी घेऊनही नाेकरी मिळेलच याची शाश्वती नाही. राेजगाराची संधीच नसल्याने काही वर्षांपासून डीएड, बीएडकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे़

-प्रा. डाॅ. राजेश खंडेराव