शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

शिक्षकाची नाेकरी नकाे रे बाबा; डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:35 IST

बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षकभरतीच हाेत नसल्याने डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील १६६० जागांसाठी केवळ ...

बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षकभरतीच हाेत नसल्याने डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील १६६० जागांसाठी केवळ ३५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तब्बल १३०४ जागा रिक्त राहणार असल्याने अनेक अध्यापक विद्यालये ओस पडणार आहेत.

डीएड, बीएड महाविद्यालयांना माेठ्या प्रमाणात मंजुरी दिल्याने गत काही वर्षांत पदवी, पदविका मिळवणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. पदवी मिळवणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी शासनाने शिक्षक भरतीला परवानगी दिली नाही. त्यातच टीईटी उत्तीर्णची अट असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीही माेठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या हाेत्या. विद्यार्थीच मिळत नसल्याने अनेक अध्यापक विद्यालये बंद हाेण्याच्या मार्गावर आहेत़

जिल्ह्यातील एकूण डीएड काॅलेज

२९

एकूण जागा

१६६०

झालेले प्रवेश

३५६

नाेकरीची हमी नाही

शिक्षक भरतीवर गत काही वर्षांपासून बंदी घालण्यात आली हाेती. त्यातच पवित्र पाेर्टलवरून भरती सुरू करण्यात आली असून त्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट आहे.

जिल्ह्यात आधीच माेठ्या प्रमाणात डीएड आणि बीएड धारक विद्यार्थी बेराेजगार आहेत.

डीएड केल्यानंतर राेजगार मिळेलच याची शाश्वाती नाही. त्यामुळे विद्यार्थी डीएडला प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे.

विद्यार्थी म्हणतात...

गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नाही. आधीच अनेक विद्यार्थी बेराेजगार असताना शासनाने टीईटी, टेट परीक्षेची अट लादली आहे. त्यामुळे, डीएड न करता बीएला प्रवेश घेतला आहे़

-प्रथमेश लाेखंडे, विद्यार्थी

शिक्षक भरती बंद असल्याने अनेक डीएड, बीएडधारक बेराेजगार झालेले आहेत. त्यातच सीईटी, टेट परीक्षा देऊनही राेजगार मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे डीएडला प्रवेश घेतला नाही़

-परीक्षित राठाेड, विद्यार्थी

शिक्षक भरती बंद असल्याचा परिणाम

सन २०१० पासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही आता टीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण हाेण्याची अट ठेवण्यात आली आहे़ त्यामुळे, डीएड, बीएडकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. यावर्षीही खूप कमी अर्ज आलेले आहेत़

-डाॅ. विजयकुमार शिंदे, प्राचार्य डायट

डीएड, बीएडची पदवी घेऊन बेराेजगार हाेणाऱ्याची संख्या अलीकडे माेठ्या प्रमाणात वाढली आहे. पदवी घेऊनही नाेकरी मिळेलच याची शाश्वती नाही. राेजगाराची संधीच नसल्याने काही वर्षांपासून डीएड, बीएडकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे़

-प्रा. डाॅ. राजेश खंडेराव