शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात नको! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:11 IST

बुलडाणा: शासनाने राज्यात राबविण्यात येणार्‍या सर्व योजना व  जिल्हा विकास निधीत ३0 टक्के कपात केली आहे; मात्र  जिल्हय़ाच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समि तीच्या निधीत कपात करू नये, असा जिल्हास्तरावरून प्रस्ताव  पाठविण्यात आला असून, जिल्हय़ातील आमदारांनीही याला  विरोध दर्शविला आहे. 

ठळक मुद्देआमदारांचा विरोध महसुली ३0 तर भांडवली योजनेच्या निधीत २0 टक्के कपात ३0 टक्के कपात करूनच दिल्या जातो निधी

विवेक चांदूरकर । लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: शासनाने राज्यात राबविण्यात येणार्‍या सर्व योजना व  जिल्हा विकास निधीत ३0 टक्के कपात केली आहे; मात्र  जिल्हय़ाच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समि तीच्या निधीत कपात करू नये, असा जिल्हास्तरावरून प्रस्ताव  पाठविण्यात आला असून, जिल्हय़ातील आमदारांनीही याला  विरोध दर्शविला आहे. शेतकर्‍यांना शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याची  घोषणा केली आहे. यासोबतच जीएसटी लागू झाल्यानंतर  एलबीटीसह अन्य कर रद्द झाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस् थांचे नुकसान झाले. परिणामी नगरपालिका, महानगरपालिकांसह  स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासन १३ हजार कोटी  नुकसानभरपाई देणार आहे. शासनाच्या तिजोरीवर हा भार  पडणार असल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळासह राज्यातील सर्व  योजनांच्या निधीत कपात करण्यात आली आहे. यामध्ये महसुली  योजनेत ३0 टक्के तर भांडवली योजनेत २0 टक्के कपात  करण्यात आली आहे. जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या काही  योजनांमध्ये १0 टक्के निधी हा जिल्हा नियोजन मंडळाचा अस तो तर ९0 टक्के निधी राज्य शासनाचा असतो. शासनाने या  योजना राबविताना मात्र, ३0 व २0 टक्के कपात करण्याचा  निर्णय घेतला आहे. त्यावर जिल्हा नियोजन समितीने शासनाने  त्यांच्याकडील निधीत कपात करू नये, असा प्रस्ताव पाठविला  आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. शासनाने  निधीत कपात केल्यामुळे अनेक योजनांना खीळ बसणार आहे.  तसेच निधी मुबलक उपलब्ध नसल्यामुळे योजना ग्रामीण जनते पर्यंत पोहोचणार नसल्यामुळे जिल्हय़ातील आमदारांनी विरोध  दर्शविला आहे. शासनाने विकासात्मक योजनांमध्ये कोणत्याही  प्रकारची कपात न करता कर्जमाफी देण्याची मागणी आ.  हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.  

३0 टक्के कपात करूनच दिल्या जातो निधीशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीत ३0 टक्के कपात  केली आहे. मात्र नियोजन समितीने सदर कपात करू नये असा  प्रस्ताव शासनाकडे पाठविला. सदर प्रस्ताव शासनाच्या  विचाराधीन आहे. त्यामुळे सध्या जिल्हा नियोजन समितीच्या  माध्यमातून देणार्‍या निधीत ३0 टक्के कपात करण्यात येत आहे.  ही कपात करूनच विविध कामांसाठी निधी देण्यात येत आहे.  शासनाने नियोजन समितीचा निधीतील कपात हटविल्यास पूर्ण  देण्यात येणार आहे. 

शासनाने राज्यात राबविण्यात येणार्‍या विकासात्मक योजनांमध्ये  कपात केली आहे. ही कपात केल्याने योजना राबविताना खीळ  बसत आहे. त्यामुळे शासनाने कर्जमाफीच्या रकमेचा बोझा  विकासात्मक योजनांवर पडू देऊ नये.                                       - आ. हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा