शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विचारस्वातंत्र्यावर बंधने नकोतच!

By admin | Updated: August 11, 2015 23:24 IST

‘लोकमत’च्या पाहणीतील निष्कर्ष; लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल.

बुलडाणा : स्वातंत्र्यदिन आला की, आपण सारे लोकशाहीच्या मूल्यांची, तत्त्वांची चर्चा करतो. बदलत्या काळात व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक होतो आहे का, याची चिंताही अनेकदा व्यक्त होते. याकूबची फाशी असो की राधे माँ संदर्भातील चर्चा, याबाबत अनेक मते-मतांतरे समोर येत आहेत. ही योग्य की अयोग्य, अशी चर्चाही झडत आहे. या पृष्ठभूमीवर 'लोकमत'ने बुलडाणा शहरात मंगळवारी नागरिकांची विशेषत: तरूणाईची मते जाणून घेण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्वेक्षण केले असता, विचार आणि व्यक्तिस्वातंत्र्याबाबत सर्वच नागरिक आग्रही असल्याचे दिसून आले. स्वातंत्र्य मिळाले, प्रगतीची अनेक दारे खुली झाली; मात्र स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा नक्कीच नाही. बदलत्या परिस्थितीत या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे अनेकांना वाटते. ३२ टक्के नागरिकांना तसे वाटते. हाच प्रकार विचारस्वातंत्र्याबाबत आहे. या स्वातंत्र्याचा अतिरेक होतो आहे, अशी चर्चा सोशल मीडियापासून तर चौकातील गप्पांमध्येही असते. ३३ टक्के लोकांना अतिरेक होतो, असे वाटत असले तरी ५५ टक्के लोकांना विचारस्वातंत्र्यावरील हा आरोप मान्य नाही. सोशल मीडियावरील मतप्रदर्शनाबाबतही नागरिकांना कुठलेही बंधन नको आहे. तब्बल ६८ टक्के नागरिकांना सोशल मीडियावर मतप्रदर्शन करण्यासाठी कुठलेही निर्बंध नको आहेत. २२ टक्के लोकांना मात्र असे निर्बंध हवे असून, १0 टक्के लोकांना काही प्रमाणात निर्बंध असले पाहिजेत, असे वाटते. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान सक्तीचे असलेच पाहिजे, असा निष्कर्ष समोर आला आहे. मतदान सक्तीचे व्हावे, यासाठी ६८ टक्के नागरिकांनी पसंती दर्शविली असली तरी २२ टक्के नागरिकांना अशी सक्ती नको आहे. १0 टक्के नागरिक याबाबत तटस्थ आहेत.