शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

विचारस्वातंत्र्यावर बंधने नकोतच!

By admin | Updated: August 11, 2015 23:24 IST

‘लोकमत’च्या पाहणीतील निष्कर्ष; लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल.

बुलडाणा : स्वातंत्र्यदिन आला की, आपण सारे लोकशाहीच्या मूल्यांची, तत्त्वांची चर्चा करतो. बदलत्या काळात व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक होतो आहे का, याची चिंताही अनेकदा व्यक्त होते. याकूबची फाशी असो की राधे माँ संदर्भातील चर्चा, याबाबत अनेक मते-मतांतरे समोर येत आहेत. ही योग्य की अयोग्य, अशी चर्चाही झडत आहे. या पृष्ठभूमीवर 'लोकमत'ने बुलडाणा शहरात मंगळवारी नागरिकांची विशेषत: तरूणाईची मते जाणून घेण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्वेक्षण केले असता, विचार आणि व्यक्तिस्वातंत्र्याबाबत सर्वच नागरिक आग्रही असल्याचे दिसून आले. स्वातंत्र्य मिळाले, प्रगतीची अनेक दारे खुली झाली; मात्र स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा नक्कीच नाही. बदलत्या परिस्थितीत या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे अनेकांना वाटते. ३२ टक्के नागरिकांना तसे वाटते. हाच प्रकार विचारस्वातंत्र्याबाबत आहे. या स्वातंत्र्याचा अतिरेक होतो आहे, अशी चर्चा सोशल मीडियापासून तर चौकातील गप्पांमध्येही असते. ३३ टक्के लोकांना अतिरेक होतो, असे वाटत असले तरी ५५ टक्के लोकांना विचारस्वातंत्र्यावरील हा आरोप मान्य नाही. सोशल मीडियावरील मतप्रदर्शनाबाबतही नागरिकांना कुठलेही बंधन नको आहे. तब्बल ६८ टक्के नागरिकांना सोशल मीडियावर मतप्रदर्शन करण्यासाठी कुठलेही निर्बंध नको आहेत. २२ टक्के लोकांना मात्र असे निर्बंध हवे असून, १0 टक्के लोकांना काही प्रमाणात निर्बंध असले पाहिजेत, असे वाटते. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान सक्तीचे असलेच पाहिजे, असा निष्कर्ष समोर आला आहे. मतदान सक्तीचे व्हावे, यासाठी ६८ टक्के नागरिकांनी पसंती दर्शविली असली तरी २२ टक्के नागरिकांना अशी सक्ती नको आहे. १0 टक्के नागरिक याबाबत तटस्थ आहेत.