शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

आकस्मिक निधी अन् शेतीची कामे रोहयोमध्ये करा

By admin | Updated: January 2, 2015 00:53 IST

काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ निवारण उपाययोजना समितीची शिफारस.

बुलडाणा: विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी आत्महत्यांचे सत्र थांबत नाही. शेतकर्‍यांची विपन्नावस्था दूर करण्यासाठी अल्पकालीन उपाययोजनांसह दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, असे मत व्यक्त करून शेतकर्‍यांना द्याव्या लागणार्‍या मदतीसाठी सरकारने निश्‍चित असा आकस्मिक निधी उभारावा तसेच रोजगार हमी योजनेचा विस्तार करून शेतीमधील कामांचाही समावेश करावा, अशी शिफारस काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ निवारण उपाययोजना समितीची राहील, असे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा. पुरके बोलत होते. काँग्रेसच्यावतीने दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी विभागवार समिती गठित करण्यात आली असून, ही समिती १ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्हा दौर्‍यावर होती. या संदर्भात समिती सदस्य प्रा. वसंत पुरके यांनी माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य बंडू सावरबांधे, हिदायत पटेल, संजय खोडके, श्याम उमाळकर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, आमदार हर्षवर्धन सपकाळ आदी उपस्थित होते. जिल्हानिहाय वेगवेगळे धोरण आखण्यापासून तर शेतकर्‍यांचे मनोबल उंचावण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. आजच्या दौर्‍यामध्ये समितीने संग्रामपूर, शेगाव, खामगाव, बुलडाणा, चिखली या भागातील शेतकर्‍यांसोबत संवाद साधला तसेच ङ्म्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील, अकोला जिल्हाधिकारी शिंदे यांच्याशीही चर्चा केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आमदार सपकाळ यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या सुचनांचा अंतर्भाव समितीच्या शिफारशीमध्ये असेल, असे ते म्हणाले.