शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

नदीजोड योजनेत बंद नलिका प्रणालीद्वारे पेनटाकळी प्रकल्पापर्यंत पाणी वळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:34 IST

वैनगंगा : नळगंगा नदीजोड योजनेअंतर्गत पैनगंगा नदी जोडण्याबाबत अहवाल अधीक्षक अभियंता अमरावती व पाटबंधारे प्रकल्प मंडळ अमरावती यांना सादर ...

वैनगंगा : नळगंगा नदीजोड योजनेअंतर्गत पैनगंगा नदी जोडण्याबाबत अहवाल अधीक्षक अभियंता अमरावती व पाटबंधारे प्रकल्प मंडळ अमरावती यांना सादर करण्यात आला आहे. त्यानुसार अहवालानुसार यामध्ये तीन पर्याय निवडण्यात आले आहे. माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी या तीनही पर्यायांचा सखोल विचार व अभ्यास करून योग्य पर्याय शासनास सुचविला आहे. भारत बोंद्रे यांचा सिंचनाचा अभ्यास पाहता शासनाने त्यांनी सुचविलेल्या पर्यायाची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. पहिल्या पर्यायातंर्गत काटेपूर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून पेनटाकळी प्रकल्पाचा बांध असलेल्या नाल्याच्या ठिकाणी चार टप्प्यांमध्ये पाणी सोडण्याचा संकल्पीत प्रस्ताव आहे. ज्यांची किंमत सुमारे ५४७२.९२ कोटी आहे. त्याद्वारे बाधित होणारे वनक्षेत्र १३.९० कि.मी., तर एकूण नलिका लांबी ७७.१० कि.मी. आहे. दुसऱ्या पर्यायात काटेपूर्णा प्रकल्पातून निघणाऱ्या नदीजोड कालव्याचे सा. क्र. ३३९.२६ मि. व पेनटाकळी प्रकल्पामध्ये पाणी सोडणे ज्यांची एकूण किंमत अंदाजे ४६८२.०३ कोटी आहे, याद्वारे बाधित होणारे वनक्षेत्र ५.५० कि.मी., तर एकूण नलिका लांबी ५५.५० कि.मी. आहे. मात्र, यामध्ये एकूण पाणी उचल, तसेच बाधित होणारे वनक्षेत्र, तसेच नलिका लांबी जास्त आहे. या पर्यायची किंमत कमी असली तरी पेनटाकळी प्रकल्पाच्या बांधाजवळ पाणी सोडल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील बराचसा भाग सिंचनापासून वंचित राहू शकतो. त्यामुळे अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी त्यांच्या अहवालात सुचविलेला तिसरा पर्याय योग्य असल्याचे मत भारत बोंद्रे यांनी मांडले आहे. या तिसऱ्या पर्यायानुसार एकूण किंमत अंदाजे ४८२०.३८ कोटी आहे. याद्वारे बाधित होणारे वनक्षेत्र पाच कि.मी., तर एकूण नलिका लांबी ३६.०० कि.मी.आहे. वैनगंगा - नळगंगा ते पैनगंगा हा नदीजोड प्रकल्प विदर्भाचे, तसेच मराठवाड्याचे वाटर ग्रीड होण्यासाठी पर्याय क्रमांक ३ अत्यंत योग्य असून, त्याद्वारे विदर्भातील सर्व जिल्हे जोडले जातील. पैनगंगा नदीत पेनटाकळी प्रकल्पाचे वरील बाजूस अंदाजे १० कि.मी.वर पाणी सोडल्यास विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश यात होईल. हा सर्वाच्या हिताचा पर्याय असून, त्यास मान्यता देण्याची मागणी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत वल्लभराव देशमुख, शंतनू बोंद्रे, नंदू आंभोरे, रवी तांबट, रवी जाधव, शिवाजी वाघमारे, विलास वसू, अशोक पाटील उपस्थित होते.