शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी फिरवला त्यांचाच आदेश, न्यायालयात शपथपत्र

By सदानंद सिरसाट | Updated: September 5, 2022 20:31 IST

निवडणूक न लढलेल्या जिल्ह्यातील १९१ उमेदवारांचा अपात्रतेचा आदेश रद्द

खामगाव (बुलढाणा) : ग्रामपंचायतींची निवडणूक लढली नसतानाही उमेदवारांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढण्यापासून अपात्र ठरवण्याचा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिलेला आदेश १ सप्टेंबरला रद्द केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १९१ जणांचा समावेश आहे, असे शपथपत्र जिल्हाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. विशेष म्हणजे, चुकीच्या माहितीच्या आधारे थेट जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशच चुकीचा ठरल्याने याप्रकरणी कोणावर कारवाई केली जाणार, ही बाब आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक लढलेल्या आणि निवडून आलेल्या उमेदवारांनी ३० दिवसांच्या आत खर्च सादर केला नाही, या कारणाने जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ रोजी आदेश देत जवळपास ११२२ जणांना अपात्र केले. त्या एकत्रित आदेशात मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील कोमल अमोल सिरसाट यांनाही सदस्यपदावरून अपात्र तसेच पुढील पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई करण्यात आली.

त्या आदेशाला त्यांनी ॲड. राम कारोडे यांच्यामार्फत आव्हान दिले. त्यावर झालेल्या सुनावणीत ग्रामपंचायतीची निवडणूक न लढण्याचा मनाई आदेश बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी कसा दिला, याप्रकरणी ३० ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने २२ ऑगस्टला दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ रोजीच्या आदेशातील १९१ नावांचा आदेश १ सप्टेंबरला रद्द केला.

आयोगाच्या आदेशाचाही संदर्भनिवडणूक आयोगाच्या २७ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशानुसार ज्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले, निवडणूक लढवली नाही, त्यांना निवडणुकीचा खर्च सादर करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केलेले आहे. त्याचाही उल्लेख जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दच्या आदेशात केला आहे.

अपात्रतेचा शिक्का मिटलेले उमेदवार

तालुका        संख्या

लोणार         ६१

मलकापूर     २७

चिखली       ५२

सिंदखेडराजा ५१

चुकीच्या माहितीला जबाबदार कोणविशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश तहसील स्तरावरील निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे या चारही तालुक्यांतील निवडणूक विभागाच्या संबंधितांनी दिलेल्या चुकीच्या माहितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचा आदेश रद्द करण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे. तसेच न्यायालयातही उभे राहावे लागले आहे. हा प्रकार करणाऱ्या संबंधितांवर आता जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार आहेत, ही बाब लवकरच समजेल.

टॅग्स :Courtन्यायालय