शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी फिरवला त्यांचाच आदेश, न्यायालयात शपथपत्र

By सदानंद सिरसाट | Updated: September 5, 2022 20:31 IST

निवडणूक न लढलेल्या जिल्ह्यातील १९१ उमेदवारांचा अपात्रतेचा आदेश रद्द

खामगाव (बुलढाणा) : ग्रामपंचायतींची निवडणूक लढली नसतानाही उमेदवारांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढण्यापासून अपात्र ठरवण्याचा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिलेला आदेश १ सप्टेंबरला रद्द केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १९१ जणांचा समावेश आहे, असे शपथपत्र जिल्हाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. विशेष म्हणजे, चुकीच्या माहितीच्या आधारे थेट जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशच चुकीचा ठरल्याने याप्रकरणी कोणावर कारवाई केली जाणार, ही बाब आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक लढलेल्या आणि निवडून आलेल्या उमेदवारांनी ३० दिवसांच्या आत खर्च सादर केला नाही, या कारणाने जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ रोजी आदेश देत जवळपास ११२२ जणांना अपात्र केले. त्या एकत्रित आदेशात मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील कोमल अमोल सिरसाट यांनाही सदस्यपदावरून अपात्र तसेच पुढील पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई करण्यात आली.

त्या आदेशाला त्यांनी ॲड. राम कारोडे यांच्यामार्फत आव्हान दिले. त्यावर झालेल्या सुनावणीत ग्रामपंचायतीची निवडणूक न लढण्याचा मनाई आदेश बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी कसा दिला, याप्रकरणी ३० ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने २२ ऑगस्टला दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जून २०२१ रोजीच्या आदेशातील १९१ नावांचा आदेश १ सप्टेंबरला रद्द केला.

आयोगाच्या आदेशाचाही संदर्भनिवडणूक आयोगाच्या २७ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशानुसार ज्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले, निवडणूक लढवली नाही, त्यांना निवडणुकीचा खर्च सादर करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केलेले आहे. त्याचाही उल्लेख जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दच्या आदेशात केला आहे.

अपात्रतेचा शिक्का मिटलेले उमेदवार

तालुका        संख्या

लोणार         ६१

मलकापूर     २७

चिखली       ५२

सिंदखेडराजा ५१

चुकीच्या माहितीला जबाबदार कोणविशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश तहसील स्तरावरील निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे या चारही तालुक्यांतील निवडणूक विभागाच्या संबंधितांनी दिलेल्या चुकीच्या माहितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचा आदेश रद्द करण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे. तसेच न्यायालयातही उभे राहावे लागले आहे. हा प्रकार करणाऱ्या संबंधितांवर आता जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार आहेत, ही बाब लवकरच समजेल.

टॅग्स :Courtन्यायालय