शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...

जिल्हा बँक शुक्रवार, शनिवारीही सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:28 IST

जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. ३१ ...

जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीतही उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च उमेदवारांना दर दुसऱ्या दिवशी निवडणूक विभागाकडे सादर करावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र खाते निवडणूक रिंगणातील उमेदवारांना उघडावे लागणार आहे. मात्र, सलग दोन दिवस सुट्या आल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांना त्यांचे स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात अडचण येण्याची शक्यता पाहता जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने जिल्ह्यातील त्यांच्या सर्व शाखा या नाताळ आणि महिन्याच्या चौथ्या शनिवारी अर्थात २५ डिसेंबर व २६ डिसेंबर रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना २५ हजार ते ५० हजार रुपयांदरम्यान निवडणूक खर्च करण्याची मर्यादा आहे. यामध्ये ७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवाराला २५ हजार, ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील उमेदवाराला ३५ हजार आणि १५ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या सदस्याला ५० हजार रुपये खर्च मर्यादा राहणार आहे. जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींमध्ये ४,७५१ सदस्य संख्येसाठी निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.