शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक संचालकांना निवडणूक लढविण्यास बंदी

By admin | Updated: August 14, 2015 00:28 IST

दिग्गजांवर येणार गंडांतर; नाबार्ड घेणार दर महिन्याला आढावा.

बुलडाणा : केंद्र, राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारात नागपूर, वर्धा व बुलडाणा येथील जिल्हा बँकांच्या संचालकांना निवडणूक लढविण्यावर बंदी घातल्याची माहिती राज्याच्या सहकार विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी बुधवारी नागपूर येथे दिली. यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे, उपाध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक दिग्गज, माजी आमदार व सहकार क्षेत्रातील नेत्यांना झटका बसला आहे. जिल्हा बँक वाचविण्यासाठी झालेल्या करारात अशी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी गेल्या दहा वर्षांत जिल्हा बँकांमध्ये पदावर राहिलेल्या संचालकांसाठी लागू राहणार आहे. जिल्हा बँका सुरू झाल्यानंतर पुढे केव्हा तरी होणार्‍या निवडणुकीत संचालकांना उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्यात झालेल्या करारात ही अट टाकण्यात आल्याची माहिती प्रधान सचिव (सहकार) शैलेशकुमार शर्मा यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर येथे बुधवारी झालेल्या बैठकीला बुलडाणा जिल्हा उपनिबंधक व जिल्हा बँकेचे प्रशासक निळकंठ करे हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शर्मा यांनी पत्रकार परिषदेत करारामधील या अटीचा गौप्यस्फोट केल्याने सहकार क्षेत्रातील दिग्गजांना मोठा हादरा बसला आहे. बुलडाणा जिल्हा बँकेचा विचार केला, तर ही बँक शिंगणे परिवार यांच्या नावाने ओळखली जाते. माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे जवळपास २५ वर्षांपासून या बँकेचे संचालक राहिले आहेत, तर खा. प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक माजी आमदार व सहकार क्षेत्रातील दिग्गजांचा संचालक म्हणून कार्यकाळ १0 वर्षांपेक्षा अधिक राहिला आहे. त्यामुळे या सर्व संचालकांना जिल्हा बँकेचे पुन्हा संचालक होण्याचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. दरम्यान, यासंदर्भात सहकार विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी करारातील अटी पाहूनच अमलबजावणी होईल, अशा स्पष्ट शब्दात दुजोरा दिल्याने येणार्‍या काळात हा मुद्दा गाजेल, अशी चिन्हे आहेत. *नाबार्ड घेणार दर महिन्याला आढावा जिल्हा बँका सुरू झाल्यानंतर नाबार्ड दर महिन्याला बँकांचा आढावा घेणार आहे. सध्या त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रशासक आहेत. यापुढे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांची सीईओ या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे तसेच बँकांमधील कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कर्जवसुलीवर भर देताना ऑडिटमध्ये आर्थिक घोटाळ्यात सहभागी लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. *जिल्हा बँका ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आर्थिक कारणांमुळे डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा येथील जिल्हा बँक आता ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहेत. शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्ज मिळाले नसले तरी रबीकरिता कर्ज देण्याची या बँकांची तयारी राहणार आहे. तिन्ही बँकांचे नाबार्डतर्फे ऑडिट करण्यात आले असून, अहवाल रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आला आहे. आर्थिक परवान्यासाठी रिझर्व्ह बँकेची कार्यवाही सुरू आहे. कोणत्या बँकेला किती निधी लागेल, यासंदर्भात राज्य सरकारला त्याची पूर्तता करावी लागणार आहे. त्यात एकूण ११४.८२ कोटी रुपये तिन्ही जिल्हा बँकांना अतिरिक्त द्यावे लागतील. यापूर्वी राज्य सरकारने या बँकांना ३८0 कोटी रुपये दिले आहेत.