शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जिल्ह्यात २0९९ शेततळी झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:36 IST

बुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २0९९ शेततळे पूर्ण झाले असून, गणेशाच्या आगमनाप्रसंगी आलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून, शेततळे पाणीदार झाली आहेत. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.

ठळक मुद्देपावसाचा रब्बी हंगामाला फायदा जमिनीतील पाण्याची पातळी वाढली

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २0९९ शेततळे पूर्ण झाले असून, गणेशाच्या आगमनाप्रसंगी आलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून, शेततळे पाणीदार झाली आहेत. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.शेती उत्पादनामध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी आणि राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे आणि त्यातून संरक्षित व शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शेततळी हा उपयुक्त पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेततळ्यांमुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाल्याचे दिसून आले आहे. या योजनेंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यातील सर्वात मोठे शेततळे ३0 बाय ३0 बाय ३ मीटर तर सर्वात लहान शेततळ्यासाठी १५ बाय १५ बाय ३ मीटर असे आकारमान निश्‍चित करण्यात आले आहे. सर्वात मोठय़ा शेततळ्यासाठी जास्तीत जास्त ५0 हजार रुपये इतके अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे, तर इतर शेततळ्यांसाठी त्यांच्या आकारमानानुसार अनुदान प्राप्त होणार आहे. अनुदानाशिवाय जास्तीचा खर्च शेतकर्‍याला करावा लागणार असून, शेतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.  या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण पाच हजार शेततळ्यांचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. यासाठी आलेल्या ८ हजार ३५८ अर्जांतून ३ हजार ९८२ अर्जदार शेतकर्‍यांना शेततळे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९४४ शेतकर्‍यांना शेततळ्याची आखणी करून देण्यात आली; मात्र  त्यापैकी २ हजार ९९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

१ हजार ९३४ शेततळ्यांचे अनुदान अदामागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत जिल्ह्यात यावर्षी २ हजार ९९ शेततळे पूर्ण झाले असून, या शेततळ्यांमध्ये पाणी आल्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे, तर पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी १ हजार ९३४ शेततळ्यांचे अनुदान एकूण ८ कोटी ५४ लाख १४ हजार रुपये संबंधित शेततळे घेतलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.-