शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २0९९ शेततळी झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:36 IST

बुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २0९९ शेततळे पूर्ण झाले असून, गणेशाच्या आगमनाप्रसंगी आलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून, शेततळे पाणीदार झाली आहेत. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.

ठळक मुद्देपावसाचा रब्बी हंगामाला फायदा जमिनीतील पाण्याची पातळी वाढली

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : दुष्काळावर मात करण्यासह शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २0९९ शेततळे पूर्ण झाले असून, गणेशाच्या आगमनाप्रसंगी आलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असून, शेततळे पाणीदार झाली आहेत. त्यामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.शेती उत्पादनामध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी आणि राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे आणि त्यातून संरक्षित व शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शेततळी हा उपयुक्त पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेततळ्यांमुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामात पावसाच्या खंडित कालावधीत फायदा झाल्याचे दिसून आले आहे. या योजनेंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यातील सर्वात मोठे शेततळे ३0 बाय ३0 बाय ३ मीटर तर सर्वात लहान शेततळ्यासाठी १५ बाय १५ बाय ३ मीटर असे आकारमान निश्‍चित करण्यात आले आहे. सर्वात मोठय़ा शेततळ्यासाठी जास्तीत जास्त ५0 हजार रुपये इतके अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे, तर इतर शेततळ्यांसाठी त्यांच्या आकारमानानुसार अनुदान प्राप्त होणार आहे. अनुदानाशिवाय जास्तीचा खर्च शेतकर्‍याला करावा लागणार असून, शेतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.  या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण पाच हजार शेततळ्यांचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. यासाठी आलेल्या ८ हजार ३५८ अर्जांतून ३ हजार ९८२ अर्जदार शेतकर्‍यांना शेततळे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ९४४ शेतकर्‍यांना शेततळ्याची आखणी करून देण्यात आली; मात्र  त्यापैकी २ हजार ९९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

१ हजार ९३४ शेततळ्यांचे अनुदान अदामागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत जिल्ह्यात यावर्षी २ हजार ९९ शेततळे पूर्ण झाले असून, या शेततळ्यांमध्ये पाणी आल्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे, तर पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी १ हजार ९३४ शेततळ्यांचे अनुदान एकूण ८ कोटी ५४ लाख १४ हजार रुपये संबंधित शेततळे घेतलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.-