शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पीक विम्याचे १४.१६ कोटी रुपये वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST

पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आ. संजय रायमूलकर यांनी जिल्ह्यातील पीक विमा योजनेबाबत अधिवेशनात शुक्रवारी प्रश्न मांडला होता. खरीप ...

पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आ. संजय रायमूलकर यांनी जिल्ह्यातील पीक विमा योजनेबाबत अधिवेशनात शुक्रवारी प्रश्न मांडला होता. खरीप हंगाम २०२० मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात आली. जिल्ह्यातील २.९५ लाख शेतकऱ्यांनी २२.०८ कोटी रक्कम विमा हफ्ता भरला. २.२६ लाख हेक्टर क्षेत्र पिकांकरिता संरक्षित करण्यात आले होते. योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालेले नुकसान या बाबींतर्गत एकूण १४ हजार ३४३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम १४.१६ कोटी रुपये विमा कंपनीमार्फत वाटप करण्यात आली. काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबींतर्गत १३१८ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ०.९० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. इतर रक्कम वाटपाची कार्यवाही सुरू आहे. विमा कंपनीकडून प्राप्त अंतरिम अहवालानुसार उत्पन्नावर आधारित ८ हजार २८४ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम १.२४ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून वाटप कंपनीस्तरावर सुरू आहे. मेहकर तालुक्यातील एकाच गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समान रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरला तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घातला होता. ही बाब भुसे यांनी मान्य केली. तालुक्यातील पीक विमा योजनेमध्ये २७ हजार १ शेतकऱ्यांनी १.८७ कोटी रुपये विमा हफ्ता भरला होता. २० हजार ८१७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालेले नुकसान या बाबींतर्गत २ हजार ७३३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ३.६८ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. इतर शेतकऱ्यांना वाटप सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.