शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मातृतीर्थाच्या अैाद्योगिक विकासात ‘विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:36 IST

बुलडाणा : समृद्धी महामार्गामुळे दळणवळणाच्या मुख्य प्रवाहात येत असेलल्या आणि जिल्ह्यात या मार्गावर होणाऱ्या दोन नवनगरांपैकी एक माळ सावरगाव ...

बुलडाणा : समृद्धी महामार्गामुळे दळणवळणाच्या मुख्य प्रवाहात येत असेलल्या आणि जिल्ह्यात या मार्गावर होणाऱ्या दोन नवनगरांपैकी एक माळ सावरगाव येथे प्रस्तावित असताना उद्योजकांचा अेाढा सिंदखेडराजा, देऊळगावराजाकडे वळत वीज प्रश्नावरून ५० कोटी रुपयांची खाद्य प्रक्रिया उद्योगात होणारी गुंतवणूक अन्यत्र हलविण्याच्या मानसिकतेत आलेल्या उद्योजकामुळे मातृतीर्थाच्या विकासाला खीळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

त्यामुळे आगामी दशकात अैाद्योगिक विकासासाठी एक महत्त्वाचे ठिकाण ठरू पाहणाऱ्या सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुक्यातील पायाभूत सुविधांवर आताच लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजातील आऊटलेटमधूनच उद्योजक अन्य ठिकाणी उद्योग उभारण्यास प्राधान्य देतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भातील भीती सिंदखेडराजाचे भूमिपुत्र संजय वायाळ यांनीच व्यक्त केली आहे. त्यामुळे वेळीच यात दखल देऊन मुळातच अैाद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या बुलडाणा जिल्ह्यात नव्याने विकसित होऊ शकणाऱ्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा टापूतील अैाद्योगिक विकासाला चालना देण्याची अवश्यकता आहे.

--नवनगराच्या कामाला वेग देण्याची गरज--

सिंदखेडराजा आणि मराठवाड्याच्या सीमेवर माळ सावरगाव, वाडेगाव आणि निमखेड येथील नवनगर उभारण्याच्या हालचालींना त्यामुळे आता वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या या तीन गावांपैकी माळ सावरगाव येथील १९०० हेक्टर व अन्य एका गाातील १२ हेक्टर जमिनीची मोजणी झाली आहे. मात्र भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. त्यामुळे याला आता वेग देण्याची गरज आहे. या तिन्ही गावांचे ड्रोन सर्वेक्षण झालेले आहे.

--ड्रायपोर्ट ठरणार महत्त्वाचा दुवा--

समृद्धी महामार्गालत माळ सावरगाव येथे उभे राहणाऱ्या नवनगरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर जालना जिल्ह्यातील दरेगाव येथे ड्रायपोर्टचे काम ४० टक्क्यांच्या पुढे झाले आहे. रेल्वेचे रुळही ड्रायपोर्टपर्यंत येत आहे. आगामी तीन वर्षात हे ड्रायपोर्ट प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकते. त्यामुळे पुढील टप्प्यात सिंदखेडराजा, देऊळगावराजा या दोन तालुक्यांचे अैाद्योगिकदृष्ट्या महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे संधी कॅश करण्यासाठी आता खऱ्या अर्थाने राजकीय इच्छाशक्तीचा जोर लावण्याची गरज आहे. यास भरीसभर म्हणून १६० दलघमी म्हणजे जवळपास ४.५३ टीएमसी क्षमतेचा खडकपूर्णा प्रकल्पही आहे. त्यामुळे उद्योगासाठी आवश्यक पाणीही येथे उपलब्ध आहे.

--सीड हबलाही हवा ‘ऑक्सिजन’--

जालना जिल्ह्यालगत असलेली देऊळगावराजा, सिंदखेडराजा आणि लोणार हे तिन्ही तालुके जिल्ह्यासाठी सीड हब आहेत. यासाठी गेल्या युती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी ६० कोटी रुपयांची घोषणा केली होती. मात्र कोरोनाच्या विघ्नामुळे सीड हब विकसित होण्यातही विघ्न आले आहे.