शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

अपंग घरकुल लाभापासून वंचित !

By admin | Updated: April 7, 2015 01:52 IST

परवड अपंगांची; केंद्राचा आदेश असतानाही केली जाते टाळाटाळ.

सुहास वाघमारे / नांदुरा(जि. बुलडाणा): दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना हक्काचे घरकुल देणार्‍या इंदिरा आवास योजनेंतर्गत मानसिक व शारीरिक अपंगत्व असणार्‍याला घरकुल देण्याबाबत केंद्र शासनाचे स्पष्ट दिशानिर्देश असतानाही प्रत्यक्षात मात्र अपंगांना या योजनेंतर्गत लाभ दिला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत आता राज्य शासनाने नवीन आदेश काढून इंदिरा आवास योजनेंतर्गत वंचित अपंगाची प्रतीक्षा यादी तयार करून त्यांना घरकुल देण्याची मागणी अपंग वर्गातून होत आहे. अपंगांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी इंदिरा आवास योजना कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाने दिशानिर्देश दिले आहेत. त्यामध्ये मानसिक व शारीरिक अपंगत्व ज्यांच्यामध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना आहेत; मात्र याबाबत राज्य शासन व प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना प्राधान्य या योजनेत दिल्या जात नाही. केंद्र शासनाने सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी जे दिशानिर्देश दिले आहेत, त्यामध्ये विधवा, परित्यक्ता तथा कठीण परिस्थितीत जीवन जगणार्‍या महिला, मानसिक व शारीरिक चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे अपंग व सशस्त्र कारवाईत जीव गमावलेल्या सैनिक व पोलीस यांना इंदिरा आवास योजनेत घरकुल देताना प्राधान्य देण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हय़ात याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने काढलेल्या ८ डिसेंबरच्या मागील वर्षाच्या पत्रात सशस्त्र कारवाईत वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी व जवळच्या नातेवाइकांना ते बीपीएल कार्डधारक नसतानाही इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या व त्याकरिता केंद्र शासनाच्या दिशानिर्देशाचा दाखला दिला. त्याच ६ डिसेंबरच्या पत्रात अपंगांनाही घरकुल देण्याबाबत नमूद केले आहे; मात्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशात अपंगांना घरकुल देण्याबाबतची सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे केंद्राचे आदेश असतानाही अपंगांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास योजनेच्या आदेशासोबत केंद्राच्या दिशानिर्देशाचे पत्र देण्यात आले. त्यामध्ये अपंगांना घरकुल देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांच्या अज्ञानामुळे व हलगर्जीपणामुळे अपंगांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे.