शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

श्री चक्रधर स्वामींच्या महोत्सवानिमित्त दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 11:05 IST

कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित न करता घरोघरी दिवे लावून संपूर्ण देशभर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी अवतारदिन महोत्सव २० आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार होता. मात्र, कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित न करता घरोघरी दिवे लावून संपूर्ण देशभर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.अखिल जीव- जातीच्या उद्धारासाठी परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींनी गुजरातची राजधानी भडोच येथे युवराज हरिपाळदेवाचे पतित उठवून शके ११४३ मध्ये अवतार स्वीकारला.श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात येवून अज्ञानरूपी अंधकाराने विषमतेत खितपत पडलेल्या समाजाला बंधुभावाचा, समानतेचा, मानवतेचा संदेश दिला. स्त्रियांना शिक्षणाचा अध्यात्माचा, मोक्षाचा अधिकार दिला. शुद्ध आचरणाने सर्व मानवजातीला अध्यात्माचा अधिकार दिला.खेडापाड्यात गोंड, भील्ल यांच्यात तथा समाजामध्ये जावून ब्रह्मविद्या ज्ञानाचा प्रकाश दाखविला. त्यातून महदंबेसारखी महिला मराठीची आद्य कवयित्री, म्हाईंभट्टांसारखे हजारो प्रकांडपंडित समानतेचा संदेश घेऊन समाजपरिवर्तन करू लागले. त्यांनी प्रवर्तन केलेल्या ईश्वरीय ज्ञान मार्गाला समाजाने महानुभाव नाव दिले. समाजप्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतरणाला २० आॅगस्ट रोजी ८०० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानुषंगानेच हा अष्टशताब्दी महोत्सव २० आॅगस्ट रोजी प्रारंभ होऊन पुढील २०२१ पर्यंत भारतभर साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे २० आॅगस्ट रोजी अवतारदिनाच्या कार्यक्रमाचे वेळी सर्व संत-महंत-तपस्विनी व उपदेशी तथा अनुयायी आश्रम, तीर्थस्थान, देवपूजा, घरासमोर जास्तीत जास्त दीप लावून विडावसर, आरती करून संपूर्ण भारतात आनंद उत्सव साजरा करणार आहेत.अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त प्रत्येकाने घरात कमीत कमी आठ दिवे लावून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या महोत्सवाला यावर्षी महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातही नागरिक घरोघरी दीपात्सव साजरा करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी हा उत्सव होणार आहे.

वर्षभर प्रबोधनाचे आॅनलाइन कार्यक्रमश्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी महोत्सवाला २० आॅगस्ट २०२० पासून प्रारंभ होत आहे. पुढील एक वर्ष हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त वर्षभर विविध प्रबोधनात्मक आॅनलाईन कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये चक्रधर स्वामींचे कार्य, त्यांनी जगाला दिलेला संदेश यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

२० आॅगस्ट रोजी महानुभाव पंथातील सर्वांनी घरोघरी दीप लावावे. तसेच आश्रम, तीर्थस्थान या ठिकाणी जास्तीत जास्त दीप लावून महोत्सव साजरा करावा.- आचार्य श्री लोणारकर मोठेबाबाअध्यक्ष, अ.भा. पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव, बुलडाणा.

 

टॅग्स :khamgaonखामगावIndian Traditionsभारतीय परंपरा