मेहकर : दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच बियाणे व खते मोफत द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन गाभणे यांनी देऊळगाव माळी कोराडी धरणामध्ये १७ एप्रिल पासून आंदोलन सुरू केले आहे.सतत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. दरवर्षी पिकांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. थोड्याफार प्रमाणात जी काही पिके आली आहेत, त्या पिकांना बाजारात भाव नाही, मातीमोल किमतीने पीक विकावे लागत आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हतबल होऊन कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी विविध राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतले आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन नाही, त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडावे, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नोटाबंदीमुळेसुद्धा शेतकरी परेशान झाले आहेत. शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड होत नसल्याने विविध बँकांनी शेतकऱ्यांना नोटिस पाठविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच बी-बियाणे, खते मोफत द्यावी, यासाठी देऊळगाव माळी ता.मेहकर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन सुरेश गाभणे यांनी १७ एप्रिलपासून कोराडीच्या धरणात पाण्यात बसून आंदोलन सुरू केले आहे. आश्वासनानंतर आंदोलनाची सांगतास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन सुरेश गाभणे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व बी-बियाणे, खते मोफत मिळावे, यासाठी कोराडी धरणात आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी गंगाधर साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी त्याठिकाणी जावून मागण्या मंजूर करण्याबाबत आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता केली.
कर्जमाफीसाठी मुंडण करून धरणात आंदोलन
By admin | Updated: April 18, 2017 00:54 IST