शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

कर्जमाफीसाठी मुंडण करून धरणात आंदोलन

By admin | Updated: April 18, 2017 00:54 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बियाणे,खते मोफत देण्याची मागणी

मेहकर : दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच बियाणे व खते मोफत द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन गाभणे यांनी देऊळगाव माळी कोराडी धरणामध्ये १७ एप्रिल पासून आंदोलन सुरू केले आहे.सतत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. दरवर्षी पिकांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. थोड्याफार प्रमाणात जी काही पिके आली आहेत, त्या पिकांना बाजारात भाव नाही, मातीमोल किमतीने पीक विकावे लागत आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हतबल होऊन कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी विविध राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतले आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन नाही, त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडावे, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नोटाबंदीमुळेसुद्धा शेतकरी परेशान झाले आहेत. शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड होत नसल्याने विविध बँकांनी शेतकऱ्यांना नोटिस पाठविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच बी-बियाणे, खते मोफत द्यावी, यासाठी देऊळगाव माळी ता.मेहकर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन सुरेश गाभणे यांनी १७ एप्रिलपासून कोराडीच्या धरणात पाण्यात बसून आंदोलन सुरू केले आहे. आश्वासनानंतर आंदोलनाची सांगतास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन सुरेश गाभणे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व बी-बियाणे, खते मोफत मिळावे, यासाठी कोराडी धरणात आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी गंगाधर साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी त्याठिकाणी जावून मागण्या मंजूर करण्याबाबत आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता केली.