शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

खामगाव परिसरात दुबार पेरणीस प्रारंभ!

By admin | Updated: July 15, 2017 00:59 IST

घाटाखालील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घाटाखालील विविध तालुक्यात अपुरा पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईत शेतमशागतीची कामे उरकून पावसाळा सुरू होत असल्याचे समजून पेरणी उरकून घेतली; परंतु यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. जुलै महिन्यातही असाच प्रकार काही शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. घाटाखालील विविध तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता पेरण्यासोबतच दुबार-तिबार पेरण्याही सुरू असल्याचे चित्र दिसून येते.बोरखेड : परिसरात गेल्या २५ दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे कोरडवाहू पेरणी उलटली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट पुन्हा शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या सुरूही केल्या आहेत.बोरखेड, पळसोडा, सोनाळा, पिंगळी, वारखेड, सगोडा आदी भागात १६ जून रोजी पावसाने हजेरी लावली. त्या आधारे जास्तीत जास्त कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर काही शेतकरी अधिक पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांची पेरणी रखडली. परिणामी, या भागात पंचवीस दिवसांपासून पाऊस न आल्यामुळे जमिनीतून अंकुरलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. अखेर शेतातील पीक जिवंत ठेवण्यासाठी कुठलीही पाणी व्यवस्था नसल्याने बरेच शेतकऱ्यांनी शेतातील पीक वखरून टाकले. पुन्हा १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून या भागात पावसाचे आगमन झाल्याने पेरणीसह दुबार पेरणीला वेग आला आहे; मात्र पेरणीला खूप उशीर झाल्याने शेतात कोणते पीक पेरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरिपाच्या पेरणीला झालेला उशीर, नैसर्गिक लहरीपणामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल्याने आज रोजी पेरणीसाठी खत बियाण्यासाठी पैसा कोठून उपलब्ध करावा, या चिंतेत शेतकरी वर्ग दिसत आहे. नैसर्गिक कोपामुळे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी सापडल्यामुळे मोठा आर्थिक फटका त्याला बसत आहे, तरी शासनाकडून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत मिळण्याची मागणी कोरडवाहू शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.