शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव परिसरात दुबार पेरणीस प्रारंभ!

By admin | Updated: July 15, 2017 00:59 IST

घाटाखालील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घाटाखालील विविध तालुक्यात अपुरा पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईत शेतमशागतीची कामे उरकून पावसाळा सुरू होत असल्याचे समजून पेरणी उरकून घेतली; परंतु यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. जुलै महिन्यातही असाच प्रकार काही शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. घाटाखालील विविध तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता पेरण्यासोबतच दुबार-तिबार पेरण्याही सुरू असल्याचे चित्र दिसून येते.बोरखेड : परिसरात गेल्या २५ दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे कोरडवाहू पेरणी उलटली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट पुन्हा शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या सुरूही केल्या आहेत.बोरखेड, पळसोडा, सोनाळा, पिंगळी, वारखेड, सगोडा आदी भागात १६ जून रोजी पावसाने हजेरी लावली. त्या आधारे जास्तीत जास्त कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर काही शेतकरी अधिक पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांची पेरणी रखडली. परिणामी, या भागात पंचवीस दिवसांपासून पाऊस न आल्यामुळे जमिनीतून अंकुरलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. अखेर शेतातील पीक जिवंत ठेवण्यासाठी कुठलीही पाणी व्यवस्था नसल्याने बरेच शेतकऱ्यांनी शेतातील पीक वखरून टाकले. पुन्हा १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून या भागात पावसाचे आगमन झाल्याने पेरणीसह दुबार पेरणीला वेग आला आहे; मात्र पेरणीला खूप उशीर झाल्याने शेतात कोणते पीक पेरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरिपाच्या पेरणीला झालेला उशीर, नैसर्गिक लहरीपणामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल्याने आज रोजी पेरणीसाठी खत बियाण्यासाठी पैसा कोठून उपलब्ध करावा, या चिंतेत शेतकरी वर्ग दिसत आहे. नैसर्गिक कोपामुळे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी सापडल्यामुळे मोठा आर्थिक फटका त्याला बसत आहे, तरी शासनाकडून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत मिळण्याची मागणी कोरडवाहू शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.