शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

मोताळय़ाचा विकास रखडला

By admin | Updated: December 31, 2014 00:25 IST

कायमस्वरुपी पद भरण्याची मागणी.

मोताळा (बुलडाणा): गावाला तालुक्याचा दर्जा मिळाला असला तरी तालुका असलेले मात्र नगरपालिका नसलेले एकमेव गाव आहे. येथील कारभार ग्रामपंचायतीमार्फतच चालविल्या जातो, त्यामुळे मोताळय़ाच्या विकासाची सारी भिस्त ही ग्रामपंचायतीवरच आहे; मात्र एवढय़ा मोठय़ा ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी लागणारा ग्राम सचिव नाही. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त असल्यामुळे अनेक विकासाची कामे खोळंबली आहेत. या तालुक्याच्या विकासाचे चित्र हे इतर १२ तालुक्याच्या दृष्टीने खेड्यातच जमा असल्याने मोताळय़ाच्या विकासासाठी शासन कधी पुढाकार घेणार, हा प्रश्नच आहे. मागासलेला तालुका म्हणून ठपका बसलेल्या मोताळा या शहराला गाव म्हटले तरी अनेक अडचणी समोर येतात. गावाच्या विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते; मात्र अनेक दृष्टीने विकासाची कामे अडली आहेत. येथील बाजार हर्रासी जाहीर स्वरूपात प्रतिवर्षी केली जात नाही. मागील तीन वर्षांची सरासरी काढून हर्रासी दिल्या जाते, त्यामुळे ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान होते. हीच बाजार हर्रासी प्रतिवर्षी केल्या गेली तर ग्रा.पं.ला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. वसुलीचे प्रमाणही अत्यल्प आहे. बाजारातील वाढत्या अतिक्रमणाला ग्रामपंचायत प्रतिबंद घालू शकत नाही. नाल्याची साफसफाई वेळेवर केल्या जात नाही. स्मशानभूमीची देखरेख व दुरूस्तीची कामेसुद्धा ग्रामपंचायतीकडून केल्या जात नाही. मोताळय़ातील बाजार हा जिल्हय़ातील सर्वात मोठा बाजार; परंतु येथे बैठक व्यवस्थेचे नियोजन नाही. गावामध्ये शासनाच्या ज्या विविध योजना जसे तंटामुक्ती, हगणदरीमुक्त गाव, ग्राम स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन योजना तसेच मनरेगाच्या कामात कोणतीही प्रगती दिसून येत नाही. अतिरिक्त आवकअभावी या गावाचा विकास खुंटला आहे.