शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

मर्यादीत साधनसामग्रीत शेती विकसित करा !

By admin | Updated: February 4, 2016 01:21 IST

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांचे प्रतिपादन.

शिरपूरजैन (जि. वाशिम): शिक्षण केवळ अभ्यासापुरते र्मयादीत न ठेवता आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करुन र्मयादीत साधनसामग्रीत योग्य शेती कशी करता येईल, याकडेही विद्यार्थ्यांंनी लक्ष द्यायला हवे, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान रिसोडद्वारा संचालित स्थानिक स्व. पुंडलिक गवळी कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे शिरपूर येथे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडेकर व खासदार भावना गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी प्रबोधन कार्यशाळा ३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन खासदार गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु डॉ. खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके, ङ्म्रीकांत पाटील, शिरपूरच्या सरपंच इंदु इरतकर यांची उपस्थिती होती. खासदार गवळी यांनी शेतकर्‍यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन दुसर्‍यावर जास्त अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान वापरुन योग्य पद्धतीने शेती करून उत्पादन वाढवावे, यामुळे शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची गरज भासणार नाही, असे म्हटले. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कारप्राप्त शेतकरी संतोष शिंदे, विश्‍वासराव बोरकर, दत्ता लोनसुने, देवराव गायकवाड, नंदकिशोर उल्हामाले, संजय कान्हेड, यादव ढवळे यांनी यशोगाथा मांडल्या. पशुविज्ञान व दुग्धतंत्रज्ञान विभागाचे डॉ.नितीन चोरे व अमोल भोंग यांनीही उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला शिरपूर, वसारी, दुधाळा करंजी, मिर्झापूर, घाटा, पांगरखेडा यासह मालेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.