शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

देऊळगाव मही ठरते कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:26 IST

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथे काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गावातील ...

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथे काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गावातील दाेघांचा मृत्यू झाला, तर एकाच दिवसात ३१ नव्या रुग्णांची नाेंद झाल्याने देऊळगाव मही काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. काेराेनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, ग्रामस्थ नियमांच उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे.

देऊळगाव राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळलेले असून, देऊळगाव मही हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. एप्रिलमध्ये महिन्यात सुरुवातीला दररोज पाच ते दहा नवे रुग्ण सापडत असताना, २७ एप्रिल रोजी ३१ नवे रुग्ण तर यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

देऊळगाव महीची सुरक्षा रामभरोसे

देऊळगाव मही परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. परिसरातील नागरिक देऊळगाव मही येथे खरेदी करण्यासाठी येत आहे. मात्र, देऊळगाव मही येथे प्रशासनाच्या सूचना पायदळी तुडवला जात असल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. देऊळगाव महीत एकही रुग्ण नव्हता, तेव्हा विनामस्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले हाेते. दुसरी लाट माेठी असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत आहे.

जनता कर्फ्यूची गरज

देऊळगाव महीत व परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. ही साखळी न तोडल्यास गावच्या गावाला कोरोनाचा विळखा बसू शकतो़. जेव्हा गावाशेजारी एक रुग्ण सापडला, तेव्हा देऊळगाव महीची बाजारपेठ बंद देऊन जनता कर्फ्यू पाळला़. आता मात्र, देऊळगाव महीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असून, या ठिकाणी जनता कर्फ्यूची गरज असल्याचे मत अनेक जाणकार यांनी व्यक्त केले.

नागरिकांनी नाहक घराबाहेर पडू नये : तहसीलदार

आपले गाव आपली जबाबदारी समजून सरपंच, पोलीस पाटील व प्रत्येक ग्रामस्थाने तर माझं घर, माझं कुटुंब याचे भान ठेवून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने शारीरिक अंतर ठेवण्यासोबतच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने स्वतःला अग्रस्थानी ठेवून गृहविलगीकरणाचा अवलंब करावा, सर्वांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे. लक्षणे दिसतात, तेव्हा नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सारिका भगत यांनी नागरिकांना केले.