शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

देऊळगाव मही ठरते कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:26 IST

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथे काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गावातील ...

देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही येथे काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गावातील दाेघांचा मृत्यू झाला, तर एकाच दिवसात ३१ नव्या रुग्णांची नाेंद झाल्याने देऊळगाव मही काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. काेराेनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, ग्रामस्थ नियमांच उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे.

देऊळगाव राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळलेले असून, देऊळगाव मही हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. एप्रिलमध्ये महिन्यात सुरुवातीला दररोज पाच ते दहा नवे रुग्ण सापडत असताना, २७ एप्रिल रोजी ३१ नवे रुग्ण तर यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

देऊळगाव महीची सुरक्षा रामभरोसे

देऊळगाव मही परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. परिसरातील नागरिक देऊळगाव मही येथे खरेदी करण्यासाठी येत आहे. मात्र, देऊळगाव मही येथे प्रशासनाच्या सूचना पायदळी तुडवला जात असल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. देऊळगाव महीत एकही रुग्ण नव्हता, तेव्हा विनामस्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले हाेते. दुसरी लाट माेठी असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत आहे.

जनता कर्फ्यूची गरज

देऊळगाव महीत व परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. ही साखळी न तोडल्यास गावच्या गावाला कोरोनाचा विळखा बसू शकतो़. जेव्हा गावाशेजारी एक रुग्ण सापडला, तेव्हा देऊळगाव महीची बाजारपेठ बंद देऊन जनता कर्फ्यू पाळला़. आता मात्र, देऊळगाव महीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असून, या ठिकाणी जनता कर्फ्यूची गरज असल्याचे मत अनेक जाणकार यांनी व्यक्त केले.

नागरिकांनी नाहक घराबाहेर पडू नये : तहसीलदार

आपले गाव आपली जबाबदारी समजून सरपंच, पोलीस पाटील व प्रत्येक ग्रामस्थाने तर माझं घर, माझं कुटुंब याचे भान ठेवून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने शारीरिक अंतर ठेवण्यासोबतच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने स्वतःला अग्रस्थानी ठेवून गृहविलगीकरणाचा अवलंब करावा, सर्वांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे. लक्षणे दिसतात, तेव्हा नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सारिका भगत यांनी नागरिकांना केले.