शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

देऊळगाव माळीच्या इकोफ्रेंडली बाप्पाला पुणेकरांकडून पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

मेहकर : यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून, ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. ...

मेहकर : यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून, ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. काळी माती व शाडू मातीच्या मूर्तींना यंदाही मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांनीही अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे. पुणे येथील चाकण आळंदी फाटा परिसरातील छोट्या-मोठ्या उद्योग व्यावसायिक व तरुण मंडळीकडून देऊळगाव माळीच्या इकोफ्रेंडली बाप्पाला पसंती दिली जात आहे.

यासाठी एकशे दहा वर्षांची परंपरा लाभलेल्या देऊळगाव माळी येथील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार प्राप्त मूर्तिकार हरिभाऊ राजाराम राऊत यांनी तयार केलेल्या काळ्या मातीची इकोफ्रेंडली मूर्ती मिळण्यासाठी चाकण आळंदी फाटा परिसरातील अनेक उद्योजकांनी मागील वर्षी मागणी केली; परंतु मागील कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार राज्यभर लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे त्या उद्योजकांची ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही; परंतु यावर्षी मात्र या गणेशोत्सवामध्ये मूर्तिकार हरिभाऊ राऊत यांच्या हस्ते बनलेली इको फ्रेंडली गणेशमूर्तीची मागणी वाढली आहे. देऊळगाव माळी येथील मूर्तिकार हरिभाऊ राऊत यांनी पुणे येथे देऊळगाव माळीतील काळी माती नेऊन तेथील गणेशभक्तांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले आहे. चाकण परिसरातील उद्योजकांचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण असले तरी इकोफ्रेंडली मूर्तीची परंपरा जपलेल्या अनेक कारागीर व संस्थांकडेही अशीच परिस्थिती यंदा आहे. काळ्या मातीपासून तयार केलेली मूर्ती असली, तरी ती मजबूत असते. ती विसर्जित केली, तरीही पाणी प्रदूषित होत नाही. तसेच पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये विसर्जन केले की, ते पाणी शेतामध्ये खत म्हणून वापरता येते.

उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाशी नाते

मूर्तिकार हरिभाऊ राऊत यांनी उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाशी नाते जोडले आहे. मागील ४० वर्षांपासून देऊळगाव माळी व परिसरात सार्वजनिक मंडळांसाठी एक ते पाच फुटांपर्यंत मूर्ती त्यांनी तयार करून दिलेल्या आहेत. २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाने हरिभाऊ राऊत यांना उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार देऊन सन्मानित केल्यानंतर इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची स्थापना आपणही करावी, अशी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जनजागृती निर्माण झाली.