शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तीस एकरावरील केळी उद्ध्वस्त

By admin | Updated: December 15, 2014 00:58 IST

शेतक-यांचे लाखोंचे नुकसान : दहिगाव-उ-हा परिसरात गारपिटीसह चक्रीवादळाचा फटका.

मोताळा (बुलडाणा) : तालुक्यातील दहिगाव व उर्‍हा परिसरात १३ डिसेंबरच्या रात्री झालेल्या चक्रीवादळासह गारपीट व पावसामुळे परिसरातील शेतकर्‍यांची जवळपास तीस एकरावरील केळींची बाग भुईसपाट झाली आहे. त्यामुळे दहिगाव व उर्‍हा परिसरातील ११ शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील दहिगाव व उर्‍हा शिवारामध्ये अनेक शेतकर्‍यांनी केळी पिकाची लागवड केली असून, या पिकाला १८ ते २२ महिन्यांचा कालावधी लागतो. जवळपास १ लाखापर्यंत प्रती हेक्टरी खर्च येणार्‍या या पिकाला जगवण्यासाठी २२ महिन्यांच्या कालावधीत शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते; परंतु १३ डिसेंबरच्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान झालेल्या दहिगाव व उर्‍ह शिवारात चक्रीवादळासह पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या केळीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास चक्रीवादळाचे थैमान, त्यातच १५ मिनिटांपर्यंत गारपीट व वेगाच्या वार्‍यासह झालेल्या पावसामुळे ऐन कटनवर आलेले शेतकर्‍यांचे (कांदय़ा बाग) केळीची हजारो झाडे फळांसह जमीनदोस्त झाली. यामध्ये दहिगाव येथील शेतकरी नारायण डिके यांची २५00 हजार झाडे, मनोज चौधरी यांची २ हजार, प्रभाकर डिके यांची १७00, भगवान डिके यांची १000, कैलास शेळके यांची १५00 झाडे, तर उर्‍हा येथील शेतकरी शंकरसिंग राजपूत यांची ३ हजार, राजेंद्रसिंग राजपूत यांची ३ हजार, महादेवसिंग राजपूत यांची २ हजार, देवीदास नेरकर यांची ३ हजार, रामदास नेरकर यांची १५00, अनिता विठ्ठलसिंग राजपूत यांची ३ हजार केळीची झाडे फळासह वारा-पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. कधी नव्हे ते सद्य:स्थितीत केळीला प्रती क्विंटल १२00 पर्यंत भाव आहे; मात्र १३ डिसेंबरचा रात्रीचा वादळी पाऊस अनेक शेतकर्‍यांना आर्थिक फटका देऊन गेला. यावर्षीच्या अत्यल्प पावसाने तालुक्यातील शेतकर्‍यांचे कापूस, सोयाबीन पीक हातातून गेले आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेले तालुक्यातील थोडेफार शेतकरी भाजीपाल्यासह केळीचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र निसर्गाच्या बेमोसमी अवकृपेमुळे काल झालेल्या वादळी पावसात जवळपास २४ ते २५ हजार केळींची लदबदलेली बाग जमीनदोस्त झाली. यामुळे सदर कुटुंबांची अवस्था बिकट झाली असून, शेतीशिवाय दुसरी मिळकत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.