शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

शेतकर्‍यांमध्ये उदासीनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:19 IST

खामगाव : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये उदासनीता दिसत असून, या प्रक्रियेबद्दलचे अज्ञान यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. 

ठळक मुद्देप्रक्रियेबाबत शेतकरी अनभिज्ञ कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये उदासनीता दिसत असून, या प्रक्रियेबद्दलचे अज्ञान यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने जून २0१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. याकरिता इच्छुक पात्र शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. हे अर्ज भरण्याकरिता अगोदर ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. आता त्यात १५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली; मात्र अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून अनभिज्ञ असून, त्यांच्यात ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत अर्ज दाखल करण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहू शकतात. परिणामी त्यांच्यावर कर्जमाफीला मुकण्याची वेळ येवू शकते. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये माहितीच्या अभावामुळे ते या प्रक्रियेपासून दूर राहत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तर शासनाने कर्जमाफीचे अर्ज ऑफलाइन स्वीकारावेत, अशी मागणी सुद्धा शेतकरीवर्गाकडून होत आहे.

मलकापुरात शिवसेनेच्यावतीने एसडीओंना निवेदन : ग्रामपंचायतमधील केंद्र सुरू करण्याची मागणीमलकापूर : मलकापूर तालुक्यात ४८ ग्रा.पं. असून, या ग्रामपंचायती अंतर्गत अद्यापही कर्जमाफीच्या दृष्टिने ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबींची दखल घेत २२ ऑगस्ट रोजी शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांनी केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी व केंद्र संचालकांशी चर्चा केली. यावेळी अनेक तांत्रिक अडचणी आढळून आल्या. या बाबीला गांभीर्याने घेत शिवसेनेच्यावतीने एसडीओंना निवेदन देण्यात आले. यामध्ये शासनाची कर्जमाफीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट, गुंतागुंतीची व आर्थिक नुकसानदायी व मानसिक त्रासाची ठरत असल्याचे नमूद केले आहे. या प्रक्रियेतील त्रास दूर करुन आपले सरकार केंद्रावरील अडचणी दूर करण्यात याव्यात व बंद असलेली केंद्रे तत्काळ सुरु करण्यात यावी, अन्यथा शेतकरी हितास्तव शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारासुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठेसह तालुका उपप्रमुख विनायक जवरे, ओंकारसिंह डाबेराव, अनंत गायगोळ, गजानन धाडे, एकनाथ डोसे, भागवत मस्कादे, विनोद बोदवडे, शामराव बिर्‍हाडे, सचिन सोनोने, भागवत पाटील, जगन रायपुरे, जितू पाटील आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

थम्ब डिव्हाईसच उपलब्ध नाहीतऑनलाइन अर्ज भरण्यासाठी थम्ब डिव्हाईस आवश्यक असून, त्याशिवाय आधार कार्डचा डाटा लिंक होत नाही; परंतु खामगावसह विविध तालुक्यात अद्याप या मशीन उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडलेली आहे. जिल्ह्यात २२ ऑगस्टपासून या डिव्हाईसचे वाटप सुरु झाले असून, खामगावात गुरुवार, २४ ऑगस्टला सदर डिव्हाईस प्राप्त होणार असल्याचे समजते.

ग्रामपंचायतींमधील केंद्र निरुपयोगीशासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र व ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र अशा तीन ठिकाणी सोय केलेली आहे; परंतु बहुतांश ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र बंद पडलेले असून तेथे हे अर्ज भरण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे.