शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ...

गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल भावात विकावा लागला. शेतकऱ्यांनी अडचणीत पेरणी उरकली. परंतु सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. या सर्व परिस्थितीचा सामना करून पीक बहरात आले असता निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टी झाल्याने मूग, उडीद या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भात शासनाच्या वतीने या

पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. सोयाबीनच्या झाडावरच शेंगांना कोंब फुटल्याने पिकाची

नासाडी झाली. काही गावातील शेतकऱ्यांना तूटपुंजी मदत मिळाली तर काही भागात अधिकाऱ्यांनी पिकाचे नुकसान होऊनसुद्धा चुकीचा अहवाल दिल्यामुळे मदतच मिळाली नाही. पीकविम्याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला नाही. नापिकीमुळे बँकेचे काढलेले कर्ज शेतकरी भरू शकले नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना बँका कर्ज वाटप करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, यावर्षी पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गतवर्षीचे असलेले बँकेचे कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने यावर्षी पीक कर्जवाटप करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार लोणार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.