शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

खते, बियाणांच्या किमती कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST

मुंबई येथे त्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. सध्या जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या व बियाणांच्या किमती वाढल्या आहेत. ...

मुंबई येथे त्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. सध्या जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या व बियाणांच्या किमती वाढल्या आहेत. डीएपीची बॅग १५०० वरुन १९०० रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे एका बॅगमागे ४०० रुपयांची वाढ झाली आहे. एनपिकेच्या किमतीत आधी ३०० रुपयांनी, तर आता ५० रुपयांनी वाढ झाली. युरियाचा भाव २६६ रुपये कायम आहे. बियाणशंच्या किमतीतही वाढ होत असून, शेतकऱ्यांसमोर पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. विदर्भात प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, मका ही पिके घेतली जातात. याचा विचार केल्यास युरियाच्या किमती कायम राहण्याचा फारसा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होत नाही. युरियासोबतच डीएपी आणि एनपीके १२-३२ या खतांच्या किमतीसुद्धा कमी करण्यात याव्यात, बुरशीनाशक कल्चर मशीन हेसुद्धा टेक्निशियनअभावी वापरले जात नाही आणि ही यंत्रणा धूळ खात पडली आहे. त्यामुळे तालुकास्तरावर या प्रमाणाच्या मूल्यांकनासाठी तसेच कल्चर मशीनसाठी टेक्निशियन नेमण्यात यावे, निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून झालेली आर्थिक घसरण पाहता, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आणि महाराष्ट्राला हे परवडणारे नाही. त्यामुळे बियाणां किमती कमी करून, उच्च प्रतिची उगवण क्षमता असणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, खत व बियाणांच्या लिंकिंगवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथक नेमण्यात यावे, आदी मागण्या जयश्री शेळके यांनी कृषिमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.

पेरणीसाठी कृषी केंद्रांना लॉकडाऊनमधून सवलत द्या

कपाशीच्या औषधींच्या किमती कमी करण्यात याव्यात, मागील वर्षभरापासून सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी लॉकडाऊनचा उपाय अवलंबिला जात आहे. शेतकऱ्यांना पेरणी करता यावी, यासाठी कृषी केंद्रांना लॉकडाऊनच्या नियमांमधून सवलत देण्यात यावी, अशी मागणीही शेळके यांनी केली आहे.