शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पेरणीपूर्वी पीक विमा माेबदला देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:36 IST

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे. यासाठी केंद्र शासनाकडे व संबंधित विमा कंपनीकडे ...

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे. यासाठी केंद्र शासनाकडे व संबंधित विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्याची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृ.उ.बा. समिती प्रशासक जालिंधर बुधवत यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली.

यासंबंधी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्यामार्फत १९ रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. गतवर्षीपासून कोरोनाने सर्वच त्रस्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अतिपावसाने खरिपात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. यंदा नवा हंगाम तोंडावर आलेला असताना गतवर्षीच्या (२०२०-२०२१) प्रधानमंत्री पीक विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस व तूर या सात पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित आहे. गतवर्षी २०२०-२०२१ या हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार १५७ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला. २ लाख २५ हजार ८१० हेक्टर क्षेत्रासाठी हा विमा काढण्यात आला. गतवर्षीच्या खरिपात पेरणीपासून कापणी पर्यंत पाऊस सारखा सुरू होता. उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न मिळण्याची आशा असताना ऐन काढणीच्या हंगामात सोयाबीनमध्ये शेतात पाणी साचलेले चित्र दुर्दैवाने पहावयास मिळाले. यावर्षीच्या आधी अर्थात २०१९-२०२० मध्ये ६८ टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला होता. महत्त्वाचे म्हणजे त्यावर्षी २ लाख ३८ हजार २७८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १ लाख ६२ हजार १८३ शेतकऱ्यांना २२३ कोटी २५ लाख रक्कम विम्याच्या मोबदल्यात मिळाली. हा चांगला अनुभव पाहता गतवर्षी सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांची वाढ पीक विमा योजनेत नोंदवली गेली. मात्र काेरोनाच्या सावटात पुन्हा एकदा नवा हंगाम तोंडावर असताना विम्याची आस शेतकऱ्यांना आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील १,४१९ गावांमध्ये अंतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अजूनही मदत मिळालेली नाही़ खरीप हंगाम सुरू हाेण्यापूर्वी पीक विमा माेबदला देण्याची मागणी जालिंधर बुधवत यांनी केली आहे.