शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करण्याची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:22 IST

खामगाव: घाटाखालील विविध तालुक्यात पिकांची परिस् िथती पावसाअभावी गंभीर बनलेली आहे. त्यामुळे आता  विविध तालुक्यांमधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  शासनाकडे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजळगाव जामोद, शेगावात तहसीलदारांना निवेदन विविध तालुक्यात पीक परिस्थिती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: घाटाखालील विविध तालुक्यात पिकांची परिस् िथती पावसाअभावी गंभीर बनलेली आहे. त्यामुळे आता  विविध तालुक्यांमधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  शासनाकडे करण्यात येत आहे.

जळगाव जामोद: दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेनेची  मागणीगत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप  िपकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक शेतकर्‍यांचा  लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. काही शे तकर्‍यांना पिकांवर वखर फिरवल्याशिवाय गत्यंतर नाही.  त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. या पृष्ठभूमीवर  जळगाव जामोद तालुका  दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात  यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेने केली  आहे. उपविभागीय महसूल अधिकारी धनंजय गोगटे यांना १४  ऑगस्टला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, तालुका प्रमुख गजानन वाघ, शहर प्रमुख कैलाससिंह सोळंके,  विधानसभा संपर्कप्रमुख आबासाहेब पतंगे, उपजिल्हाप्रमुख  शांताराम दाणे, तालुका उपप्रमुख देवीदास घोपे, माजी  तालुकाप्रमुख संतोष दांडगे, माजी न.प. उपाध्यक्ष तुकाराम  काळपांडे, माजी उपसभापती विजय काळे, नगरसेवक  रमेश ताडे, खविसं उपाध्यक्ष संजय भुजबळ, वासुदेव  क्षीरसागर, शुभम पाटील, पवन पाटील, उपशहरप्रमुख  योगेंद्र पांधी, पुंडलिक पाटील, शिवाल पाटील व पवन  तेलंगडे यांनी निवेदन दिले. 

शेगावात भारिपचे  तहसीलदारांना निवेदन कमी पावसामुळे सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण  झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शे तकर्‍यांची  दुबार-तिबार पेरणी वाया गेली. पिके वाळत  असून, ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईसुद्धा निर्माण झाली  आहे. म्हणून शेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा  आणि शेतकरी बांधवांना मदत देण्यात यावी, अशी मागणी  शहर व तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने  तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी पं.स. सभापती विठ्ठलराव पाटील, जि. प. सदस्य  तथा तालुकाध्यक्ष राजाभाऊ भोजने, पं. स. उपसभापती  सुखदेव सोनोने, युवा नेते नीळकंठ पाटील, तालुका सचिव  श्रीकृष्ण गवई, शहराध्यक्ष मिलिंद शेगोकार, दादाराव  शेगोकार, नगरसेवक राजेंद्र शेंगोकार यांच्यासह भारिप  बमसं पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.

पातुर्डा परिसरातही दुष्काळ जाहीर करापिकांच्या ऐन उभारीच्या वेळेस पावसाचा ठणठणाट  असल्याने पातुर्डा परिसरावर दुष्काळाची छाया पसरली  आहे. त्यामुळे या भागातही दुष्काळ जाहीर करण्याची  मागणी होत आहे. पावसाळ्याचे अडीच महिने व श्रावण  महिना कोरडा गेला. आता या आठवड्यात पाऊस सक्रिय  न झाल्यास पातुर्डा परिसर दुष्काळाच्या गर्तेत ढकलला  जाईल इतकी विदारक स्थिती यावर्षी झाली आहे. शासनाने  यावर्षी कर्जमाफीची घोषणा केली. त्याचे भिजत घोंगडे  आहे. नव्याने कर्जपुरवठा झालाच नाही. पेरणीसाठी  शासनाने देऊ केलेले दहा हजार अद्यापही मिळाले नाहीत.  गेल्यावर्षीच्या खर्चाची तोंडमिळवणी करत उधारीवर बी- बियाणे खरेदी करून पेरण्या उकरल्या. अपुर्‍या पावसात  पेरण्या उलटल्या. दुबार पेरण्या कराव्या लागल्या. मोफत  बियाणे व बांधावर खत यासारख्या शासनाच्या योजना  फसव्या ठरल्या. तुरळक पावसावर पिके तग धरू लागली  होती; मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस गायब  झाला. अशातच वाढत्या उष्णतामुळे पिके करपली. उडीद,  मूग ही आंतर पिके गेल्यातच जमा आहेत. सोयाबीनच्या  फुलधारणेवर पाऊस नसल्याने तेही करपले. वाढत्या उष्ण तेमुळे व अपुर्‍या पावसामुळे जमिनीला चिरे पडले. पिकांची  मुळे तुटल्याने हिरवे पीक कोमेजू लागले आहे. पातुडर्य़ात  यावर्षी जूनमध्ये ६0 मिमी, जुलैमध्ये ८0 मिमी तर  ऑगस्टमध्ये अवघा १0 मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे  पातुर्डा परिसरातील शेतकरी संकटात सापडला असून,  शासनाने याची दखल घेऊन तत्काळ दुष्काळ घोषित  करावा व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा,  अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.