शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

देऊळगावमही येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देऊळगावमही येथील रस्त्याचे सन २००५मध्ये जालना ते खामगांव रोडचे चौपदरीकरण करण्यात येणार म्हणून मोजमाप करण्यात ...

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देऊळगावमही येथील रस्त्याचे सन २००५मध्ये जालना ते खामगांव रोडचे चौपदरीकरण करण्यात येणार म्हणून मोजमाप करण्यात आले होते, तसेच अतिक्रमणही हटवण्यात आले हाेते. यावेळी येथील प्रवासी निवारा उद्ध्वस्त करण्यात आला हाेता. तेव्हापासून आजपर्यंत प्रवासी निवारा उभारण्यात आला नसल्याने परिसरातील ५० ते ५५ गावातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा, उन्हाळ्यात प्रवाशांना रस्त्यावर उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. तत्कालीन सरपंच सविता सुभाष शिंगणे यांनी प्रवासी निवाऱ्यासाठी उपाेषण केले हाेते. तेव्हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतींनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपाेषण मागे घेण्यात आले हाेते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ८१ आर जमिनीवर ३० आर बसस्थानक, २० आर पशुवैद्यकीय दवाखाना उर्वरित ३० आरवर ग्रामपंचायतीचे काॅम्प्लेक्स करण्याचा ठराव पारित करण्यात आला हाेता. त्यानंतर या प्रस्तावावर कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे, प्रवासी निवारा अजूनही बांधण्यात आलेला नाही. याकडे तातडीने लक्ष देऊन देऊळगावमही येथे प्रवासी निवारा उभारण्याची मागणी भाजप शहर अध्यक्ष कैलास राऊत यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.