शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१0२0 मेट्रिक टन धान्याची केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 01:40 IST

केंद्रिय अन्नपुर्णा योजनेअंतर्गत गत सहा महिन्यांपासून धान्य पुरवठा का नाही, बोंद्रे यांच्या प्रश्नावर सरकारचा खुलासा.

चिखली (जि. बुलडाणा): केंद्रीय अन्नपूर्णा योजनेमध्ये ६५ वर्ष किंवा त्यावरील निराधार स्त्री-पुरुषांना योजनेंतर्गत दरमहा गहू व तांदळाचे १0 किलो धान्य वाटप करण्यात येते. सदर योजना १ एप्रिल २00१ पासूून कार्यरत आहे. मात्र या वर्षीचे ऑक्टोबर २0१५ ते मार्च २0१६ च्या अन्नधान्याचे अद्यापही वितरण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. गिरीष बापट यांच्याकडे धान्य वितरणासाठी होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेत ना.बापट यांनी खुलासा करताना विलंब झालेल्या कालावधीचे अन्नधान्य मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. केंद्रीय अन्नपूर्णा योजनेच्या धान्य वितरणास विलंब होत असल्यामुळे लाभार्थींंंंंची हेळसांड होत होती. याची दखल घेत आ.राहुल बोंद्रे यांनी अन्नधान्य वितरणास विलंब का होतो आहे, असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. आ.बोंद्रे यांच्या प्रश्नाची दखल घेत राज्य सरकारने केंद्राकडे ऑ क्टोबर २0१५ ते मार्च २0१६ साठीच्या अन्नधान्याची मागणी केली आहे. तसेच एप्रिल २0१५ ते सप्टेंबर २0१५ या कालावधीकरिता प्र ितमाह १0२0 मे.टन अन्नधान्य यामध्ये (७५0 मे. टन गहू व ३३0 मे.टन तांदूळ) इतक्या अन्नधान्याची मागणी केली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्हय़ातील ३ हजार ७८८ लाभार्थींसह राज्यातील ७८ हजार ४२५ लाभार्थींकरिता ७८९ मे. टन (४८९ मे.टन गहू व ३00 मे.टन तांदूळ) अन्नधान्याचे जिल्हानिहाय मासिक नियतन देण्यात आले आहे. असा खुलासाही राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. बापट यांनी आ.बोंद्रे यांना पत्राद्वारे कळविला आहे.