शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

समिती स्थापनेच्या वादात कृषी योजनांच्या अंमलबजावणीला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST

मेहकर : पोखरा योजनेअंतर्गत वरुड गावामध्ये स्थापन केलेली ग्राम कृषी संजीवनी समिती ही बेकायदेशीर असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केल्यामुळे ...

मेहकर : पोखरा योजनेअंतर्गत वरुड गावामध्ये स्थापन केलेली ग्राम कृषी संजीवनी समिती ही बेकायदेशीर असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केल्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या माध्यमातून नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत काही गावांची निवड करून तेथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाकरिता गावपातळीवर विविध आराखडे तयार करून विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता गावस्तरीय कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात येत असते. या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाला मान्यता देण्याचे काम या समितीकडे असते. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी या शेतकऱ्यांच्या केलेल्या अर्जाच्या तपासण्या करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रकरण मार्गी लावण्यात येते. मात्र, वरुड येथे स्थापन करण्यात आलेली ग्राम कृषी संजीवनी समिती ही बेकायदा असल्याचा काही ग्रामस्थांनी आरोप केल्यामुळे या समितीच्या सभा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून पोखरा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना गावात राबविण्यात येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेकजण वंचित वरुडमध्ये अल्प व अत्यल्प असे एकूण ४५६, तर बहुधारक ८२ खातेदार आहेत. यापैकी पोखरा योजनेकरिता १९१ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, समितीच्या वादाच्या भोवऱ्यात सर्व प्रकरणे प्रलंबित असल्याने शेतकरी कृषी विभागाच्या विविध योजनेपासून वंचित आहे.

या प्रकरणाची तक्रार कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. समितीचे प्रकरण हे तपासणीकरीता गटविकास अधिकारी मेहकर यांच्याकडे चौकशीकरिता ठेवण्यात आले आहे.

-किशोर काळे, तालुका कृषी अधिकारी, मेहकर.

वरुड या गावाची पोखरा योजनेअंतर्गत निवड असल्याने येथील शेतकऱ्यांना पोखराअंतर्गतच योजनांचा लाभ घेता येतो. कृषी विभागाच्या महाडीबीटी किंवा इतर योजनेमधून लाभ घेता येत नसल्याने समितीच्या वादामुळे आमची प्रकरणे अजूनही प्रलंबितच आहेत.

-जानू शेषराव पवार, शेतकरी, वरुड.