शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

वृक्षतोड वाढली, पर्यावरणाचा ऱ्हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

शेतातील काडीकचरा पेटून देणे, शेत स्वच्छ करणे ही कामे सुरू आहेत. वन विभागाने शेतकऱ्याचे शेताचे बांधावर, शासकीय जमिनीवर माळरानावर, ...

शेतातील काडीकचरा पेटून देणे, शेत स्वच्छ करणे ही कामे सुरू आहेत. वन विभागाने शेतकऱ्याचे शेताचे बांधावर, शासकीय जमिनीवर माळरानावर, रस्त्याच्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्षरोपण केलेले आहे. वृक्ष संवर्धन, पाणी व्यवस्था यासाठीसुद्धा मोठा खर्च केलेला आहे. याशिवाय पडीत जमिनीवर व माळरानावर लहान-मोठी अनेक झाडे आहेत. झाडाची पानगळ होऊन काही झाडे वाळलेली आहेत. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीचा एक भाग म्हणून पालापाचोळा कचरा पेटवून देतात चोहीकडे पसरलेला पालापाचोळा पेटल्याने त्यात कधीकधी लहान मोठी झाडे होरपळून जातात. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बाभूळ, कडूनिंब, पळस, बेहडा इतर नव्याने उगवलेले तीन-चार फुटापर्यंत वाढलेली झाडे जळून नष्ट होत आहेत. बुंध्याशी वाळलेला भाग जळाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेली लहान झाडे जळून खाली पडतात. आजूबाजूची मंडळी त्याची तोड करण्याचे प्रकार वाढले आहे. वन विभाग माळरानावर झाडे लावून पाच सहा वर्ष नीगा राखून वाऱ्यावर सोडलेली असते. त्याची तोड होऊन परिसर उजाड बनत आहे.

वृक्षतोड थांबविण्याची गरज

वाढत्या वृक्षतोडीमुळे त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरण संतुलन राखण्याकरिता वृक्षतोड थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

एकीकडे लाखो रुपये खर्च करून शासन दरवर्षी वृक्षरोपण वृक्ष संवर्धन करते. त्यापेक्षा आपोआप उगवलेली निसर्गनिर्मित झाडे वाचवली तर खूप खर्च वाचू शकतो.