शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

काेराेनाला हरवत जिल्हा नव्या उमेदीने भरारी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

बुलडाणा : देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करीत ...

बुलडाणा : देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करीत नेत्रदीपक प्रगती साधली आहे. मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून जात आहोत. कोरोनाशी लढत आपली अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. कोरोना विषाणूला हरवित जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा मनीषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, जि. प. उपाध्यक्ष कमलताई बुधवत, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज

काेराेनाची दुसरी लाट नियंत्रणात येत नाही तोच कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आरोग्य संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये जास्त संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी स्त्री रुग्णालय येथे ५० बेड्‌स, खामगाव व शेगाव येथे प्रत्येकी ५० बेड्‌स, इतर सर्व ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १५ बेड्‌स लहान बालकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

५९.२० मेट्रिक टन ऑक्सिजन टँकची निर्मिती

ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. तसेच पाच प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. एकूण १० प्रकल्पांमधून १० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ५९.२० मेट्रिक टन क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची निर्मिती करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

१.७१ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ लाख ७१ हजार १७ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १ हजार १३० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व जिल्हा बँकेमार्फत ७७ हजार ६७० शेतकऱ्यांना ७१९.२८ कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा खरेदी करणे सोयीचे बनले.

४ लाख ५५ हजार शिवभाेजन थाळींचे वितरण

कोरोनाच्या संकट काळात गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना जिल्ह्यात विनामूल्य १७ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून जानेवारीपासून ४ लाख ५५ हजार शिवभोजन थाळी ‘पॅकिंग फूड’ स्वरूपात देण्यात आल्या आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२०-२१ मध्ये आतापर्यंत ४२ हजार ५११ व्यक्तींना रोहयोच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५८५ किलोमीटर लांबीचे ३५० रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत.

धनादेश वितरण व सत्कार

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

राज्य शासनामार्फत शहीद जवानांच्या अवलंबितांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. त्यानुसार शहीद नायक प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या वीरपत्नी कांचन प्रदीप मांदळे यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ताम्रपत्र देण्यात आले. तसेच सेवारत सैनिक नायक विद्द्याधर दामोदर शेळके (रा. बोरगाव वसु) यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अवलंबितांच्यावतीने प्रकाश दामोधर शेळके यांना फिजिकल कॅज्युल्टी आर्थिक मदतीचा धनादेश यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्याहस्ते देण्यात आला.