शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

जिल्हय़ातील धान्य नियतनात कपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:13 IST

खामगाव: धान्यासाठी असलेले नियतन, प्रत्यक्ष पुरवठा आणि मागील महिन्याची धान्याची ‘खपत’ लक्षात घेता धान्य नियतनात कपात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशासनस्तरावरून उपाययोजनाकाळाबाजार रोखण्यासाठी निर्णय

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: धान्यासाठी असलेले नियतन, प्रत्यक्ष पुरवठा आणि मागील महिन्याची धान्याची ‘खपत’ लक्षात घेता धान्य नियतनात कपात करण्यात येणार आहे. यासंदर्भातील धोरण निश्‍चिती अंतिम टप्प्यात असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या धान्य नियतनात कपात करण्यात येणार असल्याचे समजते.शासकीय धान्याचा मोठय़ा प्रमाणात काळा बाजार होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले.  राज्यातील गोंदिया, नागपूर, गडचिरोली, अमरावती, अकोलासह बुलडाणा जिल्ह्यातही रेशनचा धान्याच्या काळा बाजाराचे रॅकेट समोर आले. या धक्कादायक घटनांच्या अभ्यासाअंती राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून जिल्हानिहाय धान्याचे नियतन कमी करण्यासोबतच धान्याच्या उचल प्रक्रियेवरही शासनाकडून नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.बुलडाणा जिल्ह्यात १५३७ स्वस्त धान्य दुकाने असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा १, २0 हजार ४६0 क्विंटल म्हणजेच १२0४६ मेट्रिक टन गहू आणि तांदूळ वितरित करण्याची प्रक्रिया पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येते; मात्र धान्य वितरणात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आहे. जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत शासनाने  हजारो मेट्रिक टन धान्यसाठा जप्त केला. परिणामी बुलडाणा जिल्ह्यासाठी दरमहा १ लाख २0 हजार ४६0 क्विंटल धान्याच्या नियतनाची चाचपणी शासकीय पातळीवर करण्यात आली. शिवाय धान्याचा काळाबाजार, रेशनच्या धान्याची परस्पर विक्री हे संभाव्य धोके आणि जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा दबाव लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी नियतनासंदर्भात फेरविचार्‍याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धान्य नियतनाच्या कपातीवर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान, पुरवठा विभागाकडून याबाबत चालढकल सुरू असल्याचे दिसून येते. 

आवश्यक इतक्याच धान्याची होणार उचल! शासनाद्वारे दरमहा आवश्यकतेपेक्षा जास्त धान्याचे नियतन उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे  नियतनात समाविष्ट असलेल्या धान्याची दरमहा उचल केली जाते. परिणामी  जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार वाढीस लागला आहे.  शासनाचे कमी दराचे म्हणजेच तांदूळ-३ रुपये, गहू-२ रुपये किलोचो काळ्या बाजारात नेत दहा टनाच्या मागे दीड लाख रुपयांचा नफा कमविणारी साखळीच जिल्ह्यात कार्यान्वित असल्याची ओरड ही या निमित्ताने होत आहे. दरम्यान, पूर्वी प्रमाणेच आवश्यक इतक्याच धान्याची उचल केली जावी अशीही मागणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे. 

नियतन आणि ’खपत’मध्ये तफावत!केंद्र शासनाद्वारे राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाइटवर सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत माहे सप्टेंबर २0१७ करीता उपलब्ध करून दिलेल्या धान्याचे नियतन आणि खपत झालेल्या धान्यांची आकडेवारी उपलब्ध केली आहे. यामध्ये २१.३२ मेट्रिक टन तांदुळाचे नियतन उपलब्ध आहे; परंतु प्रत्यक्षात १५.६४ मे. टन तांदुळाची खपत झाली. त्यामुळे नियतनापेक्षत्त तांदुळाची खपत २६ टक्के कमी आहे. तर १७.८६ लाख गव्हाचे नियतन उपलब्ध असताना प्रत्यक्षात १५.३८ लाख मे. टन गव्हाची खपत झाल्याने नियतनापेक्षा गव्हाची खपत १४ टक्के कमी आहे. त्यामुळे नियतन आणि खपतमध्ये कमालीची तफावत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :agricultureशेती