शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

कृउबासमध्ये धान्यमाल घेऊन येणा-यांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 19:49 IST

लोणार : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाºयांची संख्या घटली. अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य आणण्यास पाठ फिरवली आहे. याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे. 

ठळक मुद्देदुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षी पिकांचे नुकसानअपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतक-यांनी फिरवली पाठ 

किशोर मापारीलोकमत न्यूज नेटवर्कलोणार : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाºयांची संख्या घटली. अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य आणण्यास पाठ फिरवली आहे. याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे. मागील चार वर्षांपासून तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उसनवारीच्या पैशावर शेतकºयांनी बि-बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र, शेतकºयांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. खरीपासह रबी पिकांनीही दगा दिल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सध्या लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला २५५० ते २८५० रुपये भाव आहे. पेरणी व मजुरीचा खर्च हि निघत नसल्याने शेतकºयांनी धान्य साठवून ठेवले असून काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याने सोयाबीन मजुराच्या प्रतीक्षेत शेतात उभी आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकºयाच्या हातात पैसे नसल्यामुळे दिन दीन दिवाळी असे म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरलेच नाही. ज्वारीसारख्या सोयाबीनचा दाणा राहिल्याने उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. यावर्षी चांगल्या प्रतीच्या जमिनीत एक ते दोन पोते तर काहींना ४० ते ५०  किलो उत्पादन होत आहे. यामुळे बºयाच शेतकºयांनी शेतातून सोयाबीन काढण्यासही उत्साह दाखविला नाही.

गतवर्षी सात हजार यावर्षी केवळ दोन हजार क्विंटल आवकयावर्षीच्या खरीप हंगामात निसर्ग शेतकºयावर कोपला असून, पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणाºया उलाढालीवर झाला आहे. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात ७ हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक होती. मात्र यंदा केवळ २ हजार क्विंटलची आवक असल्याने सोयाबीनची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे.