शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

जात प्रमाणपत्रासंदर्भातील निर्णय काँग्रेसचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:50 IST

खामगाव : रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीच्या जात प्रमाणपत्राच्या  आधारे कुटुंबातील अन्य व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्याचा  निर्णय काँग्रेस शासनाचा असून, राजपूत समाजाला न्याय  देण्यासाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काय केले, असा  प्रश्न माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देमाजी आमदार दिलीपकुमार सानंदांचे प्रतिपादनराजपूत समाजाला न्याय देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी काय केले?

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीच्या जात प्रमाणपत्राच्या  आधारे कुटुंबातील अन्य व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्याचा  निर्णय काँग्रेस शासनाचा असून, राजपूत समाजाला न्याय  देण्यासाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काय केले, असा  प्रश्न माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थित केला. तालुक्यातील वर्णा येथे आयोजित राजपूत समाजाच्या मेळाव्यात  ते बोलत होते. यावेळी दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,   सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय  क्र. २00७/प्र.क्र.७४/मावक-५ नुसार  २२ ऑगस्ट २00७  रोजी काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात झाला. राजपूत समाज  बांधवांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न ना. फुंडकर यांनी  केवळ १0 दिवसात कसा मार्गी लावला, याबाबत आश्‍चर्य  व्यक्त करीत, फुंडकरांनी या प्रश्नी आजवर कुठलाही पाठपुरावा  न करता राजपूत समाजाचा प्रलंबित प्रश्न स्वत: मार्गी लावल्याचे  भासवून स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्याचा हास्यास्पद प्रकार  आहे. त्यामुळे  ना. फुंडकरांनी राजपूत समाजाच्या जात प्रमाण पत्रासाठी नेमके नवीन काय केले, याचा खुलासा करावा, असे  आवाहनही  माजी आमदार  दिलीपकुमार सानंदा यांनी केले.  यावेळी     सानंदा म्हणाले की, राजपूत समाजाच्या वैधता प्रमाण पत्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सन २0१५ च्या हिवाळी  अधिवेशनात झालेल्या बैठकीत रोहयो व पर्यटन मंत्री नामदार  जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.  मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाअधिवक्ता यांचा अभिप्राय मागवून  त्यानंतर निर्णय घेण्याचे आश्‍वासन रावल यांना दिले होते; परंतु  ३ ऑक्टोबर २0१७ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठक क्र. १४८  मध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत काँग्रेसच्या  कार्यकाळात सन २00७ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणेच  निर्णय घेऊन फक्त डिजिटल लॉकर सुविधेकरिता ३0 कोटी रु पयांची तरतूद करण्यात येणार आहे. राजपूत समाजातील सर्व पोटजातींचा विमुक्त जाती व भटक्या  जमातीमध्ये (व्हीजेएनटी) मध्ये समावेश करुन फुंडकर यांनी  विशेष शासन निर्णय काढून दाखवावा. जर ना. फुंडकर यांनी  असा शासन निर्णय काढला तर महाराष्ट्रातील राजपूत समाज  बांधवांच्यावतीने त्यांचा जाहीर जंगी सत्कार करण्यात येईल,  असेही  सानंदा म्हणाले. यावेळी प्रा. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. संचालन माजी जि. प.  सदस्य सुरेशसिंह तोमर यांनी केले.  प्रास्ताविक  विश्‍वपालसिंह  जाधव यांनी केले. या मेळाव्याला खामगाव, जलंब, खोलखेड,  वरणा, जयपूर लांडे, हिंगणा कारेगाव, निपाणा, बोरजवळा,  काळेगाव, पोरज, तांदुळवाडी, निमकव्हळा, नांद्री, संभापूर,  भंडारी व खामगाव मतदार संघातील राजपूत समाज बांधव उ पस्थित होते.    -