शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

कर्जमुक्ती ही नोटबंदीच्या पापाची परतफेड : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 20:11 IST

शेगावात शिवसेनेचा शेतकरी व पदाधिकारी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव (जि. बुलडाणा): नोटाबंदीमुळे शेतकरी व सर्वसामान्य माणुस देशोधडीला लागला असून, यातून कोणाचा फायदा झाला ते आपल्याला माहित नाही; मात्र नोटाबंदीच्या या पापाची परतफेड शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीतून करावी लागल्याची बोचरी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली. शेगाव येथे गुरुवारी आयोजित शिवसेनेच्या भव्य शेतकरी व पदाधिकारी मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. तत्वत: कर्जमाफीवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही आणि कर्जमाफीची पुर्णत: अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही वेळोवेळी मांडत आलो पण त्याचे कधीही राजकारण शिवसेना करीत नाही. शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडते. हाच शिवसेनेचा पिंड आहे. ओठात एक आणि पोटात दुसरे असे शिवसेनेच्या बाबतीत कधी होत नाही. शिवसेना विघ्नसंतोषी नाही, पाप करणाऱ्यांची औलादही शिवसेनेत नाही, शेतकऱ्यांचा विश्वासघात करून राजकीय पोळी शेकणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसैनिक समर्थ आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शिवसेनेने केले. ‘मी कर्जमुक्त होणारच’ या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या कर्जमुक्ती अभियानाचा अर्ज आज आपण ‘श्रीं’च्या चरणी ठेवला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...तर मुहूर्ताची वाट पाहणार नाही!सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांना कर्जमाफी प्रामाणिकपणे मिळवून दिली तर पाच वर्ष हे सरकार पडू देणार नाही. मात्र शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल त्याला कर्जमाफीची घोषणा करून दिशाभुल केली जात असेल तर शिवसेना राज्यात भुकंप घडवून आणेल. यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहणार नाही, असा गर्भित इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर घाला!समृद्धी महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनीवर घाला घालण्याचा डाव आहे. यातून शेतकरी समृध्द नाही तर कर्जबाजारी होणार आहे. शेतकऱ्यांचे तुरीचे कोट्यावधीचे चुकारे अद्याप शासनाने दिले नाही. कर्जमाफीबाबतही शासनाचे मनसुबे खरे दिसत नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.