शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मलकापूर येथील एकाचा मृत्यू; ४४ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी वृंदावन नगर, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच ...

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी वृंदावन नगर, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच ४४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २६२ अहवाल निगेटिव्ह असून, ३८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी मंगळवारी एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २६२ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ४४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३८ व रॅपिड ॲन्टिजन टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ११४ तर रॅपिड टेस्टमधील १४८ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २६२ अहवाल निगेटिव्ह आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खामगाव शहरातील पाच, खामगाव तालुका पळशी २, सुटाळा २, बुलडाणा शहरातील १७ , बुलडाणा तालुका पाडळी १, शेगाव शहर १, दे. राजा तालुका सिनगाव जहागीर १, वाकड १, चिखली तालुका सावरखेड १, भेराड १, चिखली शहरातील दाेन, नांदुरा तालुका धाडी ४, मेहकर शहर २, मोताळा शहरातील २, मोताळा तालुका वडगाव १, मलकापूर शहरातील १ येथील संशयीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. काेराेनावर मात केल्याने चिखली येथील आठ, शेगाव ९, मलकापूर येथील ३, बुलडाणा अपंग विद्यालय १३, स्त्री रुग्णालय १, दे. राजा १, मोताळा ३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे, तसेच आजपर्यंत ९७ हजार ५७० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ८९५ आहे.

तसेच ८१८ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ९७ हजार ५७० आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ४२५ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३७० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत १६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.