शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

By admin | Updated: May 2, 2017 23:54 IST

वडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाला.

वडगाव तेजनजवळ अपघात : अज्ञात रेतीच्या वाहनाची धडकवडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाल्याची घटना २ मे रोजी सकाळी वडगाव तेजनजवळ घडली.बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे (४५) व संगीता संजय चौथे (३५) हे पती-पत्नी दोघे एम.एच.२८ क्यू. १३६० या मोटारसायकलवरून लोणारकडे सावडण्याच्या कार्यासाठी जात असताना वडगाव तेजनजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन हे रेतीचे असल्याचे समजते. हे वाहन लोणारकडून रेती घेऊन मेहकरकडे जात होते. मोटारसायकल व रेती वाहन यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून लोणार पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावकरी व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने त्यांना शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत. या रोडने रेती वाहतूक करणारी वाहने जोरात धावतात, त्यामुळे मोटारसायकलस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तरी रेती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वेगाची मर्यादा बांधून देण्यात यावी, तसेच रेतीचे वाहन रस्त्याने जात असताना ती पूर्णपणे झाकलेली असावी, अन्यथा रेतीचे कण उडून वाहनचालकांच्या डोळ्यामध्ये जावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायपूर गावावर शोककळापिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती - पत्नीचा लोणार गावाजवळ अज्ञात वाहनाने-मोटारसायकलच्या धडकेत बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे, पत्नी संगीता संजय चौथे हे सुलतानपूर गावाला रक्षाविसर्जनासाठी जात असताना वडगाव तेजनजवळ या दोघावर काळाने झडप घातली व दोघे जागेवरच ठार झाले. चौथे कुटुंबाचे गावोगावी जावून स्टील भांडी विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.त्यांच्या पश्चात अश्वीनी चौथे (२० वर्ष), पल्लवी चौथे व दहा वर्षाचा मुलगा हर्षल चौथे असे तीन मुले आहेत.लहान मुलगा एसटीने गेल्याने प्राण वाचलेदहा वर्षीय मुलगा हर्षल त्यांच्यासोबतच चिखलीपर्यंत होता; परंतु मुलाने मामाच्या घरी जालना येथे जाण्याचा हट्ट धरल्याने त्याला चौथे कुटुंबीयाने जालन्याच्या एसटी बसमध्ये बसून ते सुलतानपूरसाठी रवाना झाले; परंतु रस्त्यानेच त्यांच्यावर काळाने झडप घातली. घरातल्या दोन्ही कर्त्या व्यक्ती गेल्याने या लहान मुलांवर संकट कोसळले आहे.