शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

By admin | Updated: May 2, 2017 23:54 IST

वडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाला.

वडगाव तेजनजवळ अपघात : अज्ञात रेतीच्या वाहनाची धडकवडगाव तेजन : सुलतानपूरकडून लोणारकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती-पत्नी यांचा मृत्यू झाल्याची घटना २ मे रोजी सकाळी वडगाव तेजनजवळ घडली.बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे (४५) व संगीता संजय चौथे (३५) हे पती-पत्नी दोघे एम.एच.२८ क्यू. १३६० या मोटारसायकलवरून लोणारकडे सावडण्याच्या कार्यासाठी जात असताना वडगाव तेजनजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन हे रेतीचे असल्याचे समजते. हे वाहन लोणारकडून रेती घेऊन मेहकरकडे जात होते. मोटारसायकल व रेती वाहन यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून लोणार पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावकरी व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने त्यांना शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत. या रोडने रेती वाहतूक करणारी वाहने जोरात धावतात, त्यामुळे मोटारसायकलस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तरी रेती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वेगाची मर्यादा बांधून देण्यात यावी, तसेच रेतीचे वाहन रस्त्याने जात असताना ती पूर्णपणे झाकलेली असावी, अन्यथा रेतीचे कण उडून वाहनचालकांच्या डोळ्यामध्ये जावून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायपूर गावावर शोककळापिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पती - पत्नीचा लोणार गावाजवळ अज्ञात वाहनाने-मोटारसायकलच्या धडकेत बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील संजय प्रभाकर चौथे, पत्नी संगीता संजय चौथे हे सुलतानपूर गावाला रक्षाविसर्जनासाठी जात असताना वडगाव तेजनजवळ या दोघावर काळाने झडप घातली व दोघे जागेवरच ठार झाले. चौथे कुटुंबाचे गावोगावी जावून स्टील भांडी विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.त्यांच्या पश्चात अश्वीनी चौथे (२० वर्ष), पल्लवी चौथे व दहा वर्षाचा मुलगा हर्षल चौथे असे तीन मुले आहेत.लहान मुलगा एसटीने गेल्याने प्राण वाचलेदहा वर्षीय मुलगा हर्षल त्यांच्यासोबतच चिखलीपर्यंत होता; परंतु मुलाने मामाच्या घरी जालना येथे जाण्याचा हट्ट धरल्याने त्याला चौथे कुटुंबीयाने जालन्याच्या एसटी बसमध्ये बसून ते सुलतानपूरसाठी रवाना झाले; परंतु रस्त्यानेच त्यांच्यावर काळाने झडप घातली. घरातल्या दोन्ही कर्त्या व्यक्ती गेल्याने या लहान मुलांवर संकट कोसळले आहे.