शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

साथीच्या आजाराने ७४ बक-यांचा मृत्यू

By admin | Updated: March 18, 2016 02:09 IST

साथीच्या अज्ञात रोगाने आठ दिवसांत बकरीची ७४ पिल्लांचा मृत्यू.

कोयाळी दहातोंडे (जि. बुलडाणा): लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथे साथीच्या अज्ञात रोगाने आठ दिवसांत बकरीची ७४ पिल्लांचा मृत्यू झाला, तर १७ मार्च रोजी अज्ञात रोगाने एक गोर्‍हेही दगावले. आधीच यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी तसेच पशुपालक हवालदिल झाले आहेत. अशातच कोयाळी दहातोंडे येथे जनावरांवर विशेषत: बकर्‍यांवर अज्ञात साथ पसरली आहे. या अज्ञात साथीच्या आजाराने संजय रामकृष्ण दहातोंडे यांच्या मालकीच्या ३७ पिल्लांचा मृत्यू झाला, तर संदीप सुभाष मानवतकर यांच्या मालकीची १0 पिल्ले व एक बकरी, जनार्दन हिवरकर यांच्या मालकीची १५ पिल्ले तसेच शिवाजी अवसरमोल यांच्या मालकीच्या १२ पिल्लांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेळी पालन करणार्‍यांमध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. याच अज्ञात साथीने कैलास नामदेव नरवाडे यांच्या मालकीचे गोर्‍हे १७ मार्चला दगावले. त्यामुळे या शेतकर्‍यांचे जबर नुकसान झाले आहे. आजार नेमका कोणता आहे, हे अद्याप कुणाला कळले नाही. विशेष म्हणजे, गावात एकाही पशुवैद्यकीय अधिकार्‍याने येऊन चौकशी केली नाही. पशुपालकांचे साथीच्या आजाराने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने भरापाई मिळावी, अशी मागणी होत आहे.