शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंत्रविषारच्या रोगाने ६0 बक-यांचा मृत्यू

By admin | Updated: June 22, 2015 02:15 IST

मातोळा तालुक्यातील खैरखेड येथील घटना; शेकडो बक-यांना झाली लागण.

मोताळा (जि. बुलडाणा): आंत्रविषार या रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील खैरखेड येथे तब्बल ६0 बकर्‍यांचा मृत्यू झाला, तर शेकडो बकर्‍यांना रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.सोमवार, १५ जूनपासून खैरखेड येथील बकर्‍यांना आंत्रविषार या रोगाची लागण झाल्याचे पशुपालकांच्या लक्षात आले. या रोगामध्ये तोंडातून फेस येऊन बकर्‍यांचा मृत्यू होतो. सोमवारपासून या रोगाची लागण झालेल्या बकर्‍या तडकाफडकी मरत आहेत. नवीन पालवी खाल्ल्याने व दूषित पाणी पिल्याने या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी पसरटे यांनी सांगितले. बाधित बकर्‍यांना सध्या लसीकरण करण्यात येत आहे.डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या खैरखेड गावात शेतामध्ये मजुरी करणारे बहुतांश नागरिक असून, शेतीला पर्याय म्हणून शेळीपालन हा व्यवसाय येथील नागरिकांचा आहे; मात्र शेकडो बकर्‍यांना आंत्रविषारची लागण होऊन त्यापैकी अनेक मेल्या आहेत. वृत्त लिहीपर्यंतदेखील लागण झालेल्या बकर्‍या दगावत असल्याचे सांगितले जात आहे. मरण पावलेल्या बकर्‍यांमध्ये काही गाभण असल्याने पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत खैरखेड येथील विजयसिंह लख्खू नाईक यांच्याकडील नऊ, गंगाबाई घोती, धनसिंह नाईक, गोविंदसिंग लख्खू नाईक यांच्याकडील आठ, बसनदास पडवाळ, रामदास लक्ष्मण गवई, रमेश लक्ष्मण मोरे यांच्याकडील सात, अरविंद घोती, सजनसिंग नाईक यांच्याकडील सहा, तर वसंत पडवाळ यांच्या चार बकर्‍या मेल्याने त्यांचे जबर नुकसान झाले. गेल्या पाच दिवसांपासून बकर्‍या दगावण्याच्या घटना घडत आहे. दरम्यान, आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. पसरटे यांच्याशी संपर्क साधून योग्य खबरदारी घेण्याच्या व प्रतिबंधात्मक उपचार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषद सदस्य अनिल खाकरे यांनीसुद्धा गावात पाहणी केली. ऐन पेरणीच्या तोंडावर या घटनेने पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.