शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:45 IST

बुलडाणा: यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे  जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आहे.  त्यात नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ होणार  असून, टंचाईग्रस्त १४0 गावातील पाणीटंचाई दूर  करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागणार  आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा १४0 गावे पाणीटंचाईग्रस्त गावांना ९७ हातपंपांचा  आधार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे  जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आहे.  त्यात नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ होणार  असून, टंचाईग्रस्त १४0 गावातील पाणीटंचाई दूर  करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागणार  आहे.जिल्ह्यात ७१२.७ मि.मी. सरासरी पर्जन्यमान अस ताना यावर्षी आजपर्यंत ४९५.६ मि.मी. म्हणजे  सरासरीच्या ६९.९३ टक्के पाऊस झाला आहे. सदर  पाऊस अल्प असून, जिल्ह्यातील विविध प्रकल्पात  अल्प जलसाठा आला आहे.  संभाव्य टंचाईग्रस्त  गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी जिल्हा  परिषदेच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत  विंधन विहिरी व कूपनलिका घेण्यात येतात; मात्र  मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस  झाल्यामुळे यापूर्वी घेण्यात आलेल्या विंधन विहिरी व  हातपंपाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आज रोजी अनेक  ठिकाणच्या विंधन विहिरी व हातपंप नादुरुस्त आहेत.   पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने काही वर्षांत ट प्प्याटप्प्याने गाव, वाड्या, वस्त्यांवर विंधन विहिरी  खोदून त्यावर हातपंप बसवले आहेत. हे हातपंप  सुरुवातीच्या काळात सुयोग्य पद्धतीने चालले; पण  देखभाल दुरुस्तीअभावी अनेक पंप, अनेक वर्षां पासून बंद पडले आहेत. त्यांचा वापर थांबल्याने पंप  गंजले, तुटले आहेत. तर येणार्‍या उन्हाळ्यात  जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे गावे व हवामानाचा  अंदाजानुसार यावर्षी पाणीटंचाईग्रस्त गावात विंधन  विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी प्रस्ताव पाठवून उ पाययोजना करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील  संभाव्य १४0 गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी  १४९ कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या पैकी १0८ कामांना मंजुरी देऊन १0४ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत. त्यात ९२ ठिकाणी हातपंप  तर ५ ठिकाणी वीज पंप बसविण्यात आले आहेत. तर  ७ ठिकाणी पाणी खोल असल्याचे दिसून आले.