शहरं
Join us  
Trending Stories
1
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
2
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
3
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
4
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
5
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
6
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
7
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
8
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
9
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
10
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
11
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
12
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
13
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
14
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
15
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
16
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
17
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
18
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
19
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
20
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल

धोकादायक पूल ठरतोय जीवघेणा

By admin | Updated: August 10, 2014 23:58 IST

धाड : प्रमुख मार्गावरील नागरी वस्तीस धोका

धाड : स्थानिक गावातून जाणार्‍या प्रमुख मार्गावरील पूल रहदारीसह नागरी वस्तीस धोक्याचा ठरला आहे. या पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांना नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून धाड गावाजवळून जाणार्‍या बाणगंगा नदीवर धामणगाव रोडवरील पुलामुळे आणि औरंगाबाद मार्गावरील नाल्यावरील पुलाने सतत पुराचे पाणी हे गावालगतच्या नागरी वस्तीत शिरते. सिमेंटची नळकांडे रचून तयार करण्यात आलेल्या पुलात वर्षानुवर्षे गाळ व काडीकचरा साचत असल्याने हा पूल बंद अवस्थेत असल्याने नदीला येणार्‍या पुराचे पाणी या ठिकाणी अडून ते नागरी वस्तीत शिरते, तर पुलावरून पाणी वाहण्याच्या प्रकाराने तासन्तास वाहतूक खोळंबते.साधारण १५ ते १८ वर्षांपूर्वी करडी आणि धाड या गावांच्या लगत असणारी कृषी क्षेत्राची जमीन संपादित करून करडी गावालगत धरणाची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन स्थितीत गावाशेजारील रहिवासी जागाही धरणाकरिता संपादित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख मार्गावरील असणार्‍या पुलांची उंची व रस्ते वाढवून प्रशस्त असे पूल व रस्ते बांधकाम होणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन स्थितीत संबंधित कुठल्याच विभागाने या गंभीर विषयावर लक्ष न देता वेळ मारून नेली. परंतु त्याचे परिणाम मात्र नागरिकांना भोगावे लागत आहे. किमान एक कि.मी. पर्यंतचा धाड ते करडी मार्ग केवळ धरणाचे पाण्यामुळे सतत नादुरुस्त राहतो. जागोजागी त्यास खड्डे पडताना दिसतात. कारण रोडच्या लगत धरणाचे पाणी येऊन साचते. गेल्या काही वर्षात या रोडची अनेकदा बांधणी केल्या गेली; परंतु हा मार्ग नेहमीच खराब होतो. सध्या पावसाळी वातावरण असून, धाड ते करडी रोड पूर्णत: खराब झाला असून, यावर रोज अपघात घडत आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी दोन्ही मार्गावर प्रशस्त उंचीचे पुलांच्या बांधकामासह रोडच्या बांधकामाची मागणी अनेकदा ग्रामस्थांनी करूनही संबंधित विभाग झोपेत आहे. सदर प्रकाराने या भागातील पूल आणि रस्ते आपत्तीसह जीवघेणे ठरत आहे.** क्षतिग्रस्त पुलाचे बांधकाम नाहीऔरंगाबाद रोडवर गावालगत असलेल्या नाल्यावरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २0१३ जूनमध्ये प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाचे कंत्राट ठेकेदारास दिले. या मार्गावरील असणारी वाहतूक पाहता या ठिकाणी प्रशस्त असा मोठा पूल बांधणे आवश्यक होते. मात्र संबंधित विभागाने घाईत या पुलाचे कंत्राट देऊन वेळ मारून नेली. परंतु तब्बल वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरीही या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. वास्तवात या ठिकाणी रोडच्या दुतर्फा भागात धरणाचे पाणी येऊन साचते. ही बाब लक्षात असूनही बांधकाम खात्याने पुलाच्या होणार्‍या बांधकामावर मुळीच लक्ष दिले नाही. परिणामी हा पूल असून अडचणीचा ठरला आहे. तर धामणगाव रोडवरील पूल अजूनही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.