शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक पूल ठरतोय जीवघेणा

By admin | Updated: August 10, 2014 23:58 IST

धाड : प्रमुख मार्गावरील नागरी वस्तीस धोका

धाड : स्थानिक गावातून जाणार्‍या प्रमुख मार्गावरील पूल रहदारीसह नागरी वस्तीस धोक्याचा ठरला आहे. या पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांना नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून धाड गावाजवळून जाणार्‍या बाणगंगा नदीवर धामणगाव रोडवरील पुलामुळे आणि औरंगाबाद मार्गावरील नाल्यावरील पुलाने सतत पुराचे पाणी हे गावालगतच्या नागरी वस्तीत शिरते. सिमेंटची नळकांडे रचून तयार करण्यात आलेल्या पुलात वर्षानुवर्षे गाळ व काडीकचरा साचत असल्याने हा पूल बंद अवस्थेत असल्याने नदीला येणार्‍या पुराचे पाणी या ठिकाणी अडून ते नागरी वस्तीत शिरते, तर पुलावरून पाणी वाहण्याच्या प्रकाराने तासन्तास वाहतूक खोळंबते.साधारण १५ ते १८ वर्षांपूर्वी करडी आणि धाड या गावांच्या लगत असणारी कृषी क्षेत्राची जमीन संपादित करून करडी गावालगत धरणाची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन स्थितीत गावाशेजारील रहिवासी जागाही धरणाकरिता संपादित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख मार्गावरील असणार्‍या पुलांची उंची व रस्ते वाढवून प्रशस्त असे पूल व रस्ते बांधकाम होणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन स्थितीत संबंधित कुठल्याच विभागाने या गंभीर विषयावर लक्ष न देता वेळ मारून नेली. परंतु त्याचे परिणाम मात्र नागरिकांना भोगावे लागत आहे. किमान एक कि.मी. पर्यंतचा धाड ते करडी मार्ग केवळ धरणाचे पाण्यामुळे सतत नादुरुस्त राहतो. जागोजागी त्यास खड्डे पडताना दिसतात. कारण रोडच्या लगत धरणाचे पाणी येऊन साचते. गेल्या काही वर्षात या रोडची अनेकदा बांधणी केल्या गेली; परंतु हा मार्ग नेहमीच खराब होतो. सध्या पावसाळी वातावरण असून, धाड ते करडी रोड पूर्णत: खराब झाला असून, यावर रोज अपघात घडत आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी दोन्ही मार्गावर प्रशस्त उंचीचे पुलांच्या बांधकामासह रोडच्या बांधकामाची मागणी अनेकदा ग्रामस्थांनी करूनही संबंधित विभाग झोपेत आहे. सदर प्रकाराने या भागातील पूल आणि रस्ते आपत्तीसह जीवघेणे ठरत आहे.** क्षतिग्रस्त पुलाचे बांधकाम नाहीऔरंगाबाद रोडवर गावालगत असलेल्या नाल्यावरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २0१३ जूनमध्ये प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाचे कंत्राट ठेकेदारास दिले. या मार्गावरील असणारी वाहतूक पाहता या ठिकाणी प्रशस्त असा मोठा पूल बांधणे आवश्यक होते. मात्र संबंधित विभागाने घाईत या पुलाचे कंत्राट देऊन वेळ मारून नेली. परंतु तब्बल वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरीही या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. वास्तवात या ठिकाणी रोडच्या दुतर्फा भागात धरणाचे पाणी येऊन साचते. ही बाब लक्षात असूनही बांधकाम खात्याने पुलाच्या होणार्‍या बांधकामावर मुळीच लक्ष दिले नाही. परिणामी हा पूल असून अडचणीचा ठरला आहे. तर धामणगाव रोडवरील पूल अजूनही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.