शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

दप्तर दिरंगाईनेच वाढल्या सिंचन प्रकल्पांच्या किमती!

By admin | Updated: February 25, 2016 01:48 IST

जिगाव प्रकल्प झाला पाच हजार सातशे आठ कोटीचा.

राजेश शेगोकार/ बुलडाणा घाटाखाली व घाटावर असा भौगोलिकदृष्ट्या विभागल्या गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यात घाटावर खडकपूर्णा अन् घाटाखाली जिगाव हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांना मिळालेली मान्यता, निधींची उपलब्धता अन् प्रत्यक्षात सुरू झालेल्या कामांच्या कालावधीचा आढावा घेतला तर प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईनेच सिंचनाचा बळी घेतल्याचे स्पष्ट होते. सिंचन प्रकल्पाच्या वाढलेल्या किमतींना प्रशासकीय दिरंगाई जबाबदार आहेच, त्यासोबतच याच लालफितशाहीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प हा किमान १0 वर्षे उशिराने सुरू झाला असून, जिगाव प्रकल्पाला मंगळवारी सुधारित मान्यता मिळून तो प्रकल्प आता पाच हजार कोटींच्या घरात गेला आहे. जिगाव व खडकपूर्णा या महत्त्वाकांक्षी मोठय़ा प्रकल्पांसोबतच मध्यम प्रकल्पांच्या नशिबीसुद्धा सरकारची दप्तर दिरंगाई आली असल्याने सिंचन व पाणीपुरवठय़ासाठी निर्माण केलेले प्रकल्प हे रखडल्या गेले. १ लाख १ हजार ८८ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाला एकूण ४ वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्या व आता त्यामध्ये आणखी एका सुधारित प्रशासकीय मान्यतेची भर पडली. हा प्रकल्प १९९६ मध्ये मंजूर असतानाही १९९९ पर्यंत निधीच उपलब्ध झाला नाही, तर कालव्याऐवजी उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यातही बराच कालव्यपय झाल्याने हा प्रकल्प रखडला, त्यातच या प्रकल्पांना तत्परतेने निधी खेचून आणण्यासाठी लागणारी राजकीय महत्त्वाकांक्षा कमी पडल्यानेच निधी उपलब्ध होण्याबाबत शासनाने टाळाटाळ केली, हे स्पष्टच होते. खडकपूर्णा नदीवर गारखेड गावाजवळ उभारण्यात आलेला हा प्रकल्प आता पुर्णत्वास आला असला तरी रखडलेल्या पुनर्वसनामुळे केवळ ४२ टक्के जलसाठा दरवर्षी ठेवावा लागतो, अशी स्थिती आहे. २0 हजार ७२0 हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाला बुडीत क्षेत्रातील लोकांनी तसेच मराठवाड्याच्या बेलदरी प्रकल्पातील पाणी अडविल्या गेल्याने या भागातील लोकांनी केलेल्या विरोधामुळेही हा प्रकल्प वाढला आहे. या प्रकल्पास १६ ऑगस्ट १९८९ मध्ये पहिली मान्यता मिळाली; मात्र १९९४-९५ च्या आर्थिक वर्षापर्यंत निधी उपलब्ध झाला नाही, तर सन २00३-0४ व सन २00४-0५ या वर्षात अपुरा निधी दिला आहे.