शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वादळी वारा व पावसाने ऊस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:50 IST

वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. 

ठळक मुद्देहिवरा आश्रम परिसररात वादळीवा-यासह पाऊसशेतक-यांचे नुकसानपंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. मेहकर तालुक्यात मंगळवारी व बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसासोबत जोराचा वारा वाहत होता. या वाºयामुळे व पावसामुळे लव्हाळा, गजरखेड, पेनटाकळी परिसरातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व ऊस पीक हे मुळासकट आडवे पडले आहे. त्यामुळे हा ऊस पुन्हा उभा राहण्याची शक्यता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. अगोदरच पाऊस वेळेवर नसल्याने व सोयाबीन पिकांना बºयाच ठिकाणी शेंगा लागल्या नसल्याने त्यात ऊस पिकाचेही नुकसान झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. यामध्ये लव्हाळा येथील श्रीकृष्ण लहाने यांचा १ हेक्टर ऊस, गजरखेड शिवारातील अमोल अशोक गायकवाड ०.४० हे, अशोक भिमराव गायकवाड ०.८० हे, भगवान संतोष लाकडे ०.८० हे, मंगेश ज्ञानेश्वर लाकडे ०.६० हे, निलेश अशोक लाकडे ०.६० हे., तर पेनटाकळी शिवारातील जगाराव साहेबराव दळवी १.०० हे, रंगराव साहेबराव दळवी १ हे., केशव साहेबराव दळवी १.४० हे, श्रीराम देवराव धोंडगे ०.८० हे. एवढ्या क्षेत्रावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक परिसरात कमी  जास्त प्रमाणात पाऊस झाला असून काही नदी, नाल्यांना पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या मुग, उडीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित विभागाने नुकसानग्रस्त पिकांचा सर्वे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.