शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

गारपिटीमुळे जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:05 IST

मदत व पुनर्वसन विभागाला पाठविला अहवाल : ११४ गावांना बसला फटका बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस ...

मदत व पुनर्वसन विभागाला पाठविला अहवाल : ११४ गावांना बसला फटका

बुलडाणा : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सहा तालुक्यांत १७,५५७ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांमार्फत मदत व पुनर्वसन विभागास सादर केला आहे. या गारपिटीमुळे सहा तालुक्यांतील ११४ गावांतील शेतीपिकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात १७ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. प्रारंभी बुलडाणा तालुक्यात सकाळी संततधार पाऊस पडून अंगावर वीज पडल्याने तांदुळवाडी येथील एका ६० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. शेतातील सुडी झाकण्यासाठी हा वयोवृद्ध शेतकरी गेला होता. त्यावेळी अचानक त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चिखली, देऊळगाव राजा, लोणार, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांसह सर्वच १३ ही तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. काही भागात अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ गारपीट झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सायंकाळी मेहकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांतही हा अवकाळी पाऊस बरसला होता.

यासंदर्भात नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने आठ दिवसांपूर्वीच जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. ती तंतोतंत खरी ठरली होती. सोबतच शेतकऱ्यांनाही त्यांनी काढणीस आलेले पीक योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवण्याबाबत आवाहन केले. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात नुकसानीचा आकडा कमी करण्यास मदत झाली होती.

जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यांतील एकूण ११४ गावांमध्ये शेतीपिकांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने प्राथमिक स्तरावर तयार केलेला हा अहवाल असून, त्यात १७,५५७ हेक्टरवर नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. या नुकसानीमध्ये उर्वरित तालुक्यांतील काही गावांचाही समावेश होऊ शकतो.

--या पिकांचे झाले नुकसान--

गहू, हरभरा, कांदा, मका, फळपिके, ज्वारी, भाजीपाला, बिजोत्पादन कांदा, द्राक्ष, डाळींब, लिंबू, भुईमूग, बाजरी या पिकांचे प्रामुख्याने नुकसान झालेले आहे. प्रसंगी यात चिखली व बुलडाणा तालुक्यांत झालेल्या नुकसानीचाही समावेश होऊ शकतो. अद्याप नुकसानीचा अहवाल अंतिम झालेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

--तालुकानिहाय नुकसान--

तालुका--बाधित गावे-- बाधित क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये)

ज. जामोद-- १६--१५४

संग्रामपूर--१०--९१

मेहकर--०३--५५

लोणार --२५--३०४५

दे. राजा --४१--९९९७

सि. राजा --१९--४२१५

एकूण--११४--१७५५७