शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जामोद येथे संचारबंदी शिथिल

By admin | Updated: April 20, 2016 02:01 IST

जनजीवन पूर्वपदावर; पोलिसांनी काढला गावक-यांसोबत शांतीमार्च.

जामोद (जि. बुलडाणा): येथे शनिवारी रात्रीपासून लावलेली संचारबंदी मंगळवारी शिथिल करण्यात आली असून, मंगळवारी सकाळी ९.३0 वाजता कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सर्वधर्मीय तथा सर्वपक्षीय शांतीमार्च काढण्यात आला. या शांतीमार्चला बसथांब्याजवळून सुरुवात झाली. त्यानंतर हा शांतीमार्च सुभाष चौक, बेंबळेश्‍वर मंदिर, जैन मंदिर परिसरातून पेठपुरा, पोलीस चौकी रोड ते मशीदजवळून पुन्हा सुभाष चौकातून बस थांब्याजवळ आल्यानंतर शां तीमार्चचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांनी गावकर्‍यांना आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु करून शांतता राखण्याचे आवाहन केले. या शांतीमार्चमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विकास झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, तहसीलदार अनिलकुमार हेडकर, ठाणेदार विजय पाटकर, माजी जि.प.सदस्य कैलास बोडखे, माजी जि. प.अध्यक्ष प्रकाश पाटील, खालीकबाप्पु देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, बाबू जमादार, जि.प.सदस्य सुरेश अंबडकार, पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे, आशा डाबेराव, सरपंच झुमकी चन्नीलाल, पोलीस पाटील रतनलाल गांधी, भारिप- बमसं तालुकाध्यक्ष अरुण पारवे, हुसेन डायमंड, राजू कोकाटे, अमानसेठ जळगाव, पुरुषोत्तम राठी, अनिल चांडक, मुजम्मील खान नांदुरा, नगर परिषद उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, कैलास डोबे, ग्रा.पं.सदस्य पुष्पा धुर्डे, सुमित्रा कपले, माजी सरपंच पुंडलीक ढगे, युसूफ मेंबर, विजय वानखडे, मोठय़ा संख्येने पोलीस ताफा, पत्रकार तथा गावातील बहुसं ख्य हिंदू-मुस्लीम तथा महिला बहुसंख्येने उपस्थित होते.