शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

जानेफळ परिसरात पावसाअभावी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

येत्या काही दिवसात दमदार पाऊस न पडल्यास अंकुरलेले पिकांचे रोपटे सुकून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले ...

येत्या काही दिवसात दमदार पाऊस न पडल्यास अंकुरलेले पिकांचे रोपटे सुकून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मृग नक्षत्र प्रारंभ झाल्यापासूनच शेतकऱ्यांना सोसावा लागत असून आधी पाऊस जास्त झाल्यामुळे शेती खरडून गेली. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली आहे. आता पाऊस नसल्याने पेरणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. जानेफळ महसूल मंडळात एकूण १४ गावे असून जून महिन्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाच्या ओलीवर परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी मृगाचा योग साधत खरिपाची पेरणी पूर्ण केली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे होत्याचे नव्हते केले होते. शेकडो शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले उडीद, मूग व सोयाबीन पावसात भिजून नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासल्याने अनेक शेतकऱ्यांना १०० ते ११० रुपये किलोने सोयाबीन बियाणे विकत घेणे भाग पडले आहे.

परंतु यावर्षी पाऊस वेळेवर आल्याने पेरण्या वेळेवर झालेल्या आहेत. पिकांची उगवण सुद्धा चांगली झाली आहे. मात्र असे असतानाच मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतीत झाला आहे. परिसरात शेती करणे हाच मुख्य व्यवसाय असून वर्षभर शेतीचे कामे करून ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. सध्या महागाईच्या काळात शेती करणे परवडत नाही, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. मात्र तरी सुद्धा काही शेतकरी आपली शेती ठोका व बटईने देतात तर अनेक शेतकरी स्वतःच मेहनत घेत शेतीचे कामे करीत असतात.

पेरणीचा खर्च वाढला

यावर्षी पेरणीचा वाढलेला खर्च तसेच बी-बियाणे व रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलेले आहे. असे असताना सुद्धा शेतकरी बांधवांनी मोठ्या हिमतीने पेरणी केलेली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाऊस गायब झाल्याने पाण्याअभावी पिके सुकण्याची वेळ आली आहे.