शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जानेफळ परिसरात पावसाअभावी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

येत्या काही दिवसात दमदार पाऊस न पडल्यास अंकुरलेले पिकांचे रोपटे सुकून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले ...

येत्या काही दिवसात दमदार पाऊस न पडल्यास अंकुरलेले पिकांचे रोपटे सुकून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मृग नक्षत्र प्रारंभ झाल्यापासूनच शेतकऱ्यांना सोसावा लागत असून आधी पाऊस जास्त झाल्यामुळे शेती खरडून गेली. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली आहे. आता पाऊस नसल्याने पेरणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. जानेफळ महसूल मंडळात एकूण १४ गावे असून जून महिन्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाच्या ओलीवर परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी मृगाचा योग साधत खरिपाची पेरणी पूर्ण केली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे होत्याचे नव्हते केले होते. शेकडो शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले उडीद, मूग व सोयाबीन पावसात भिजून नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासल्याने अनेक शेतकऱ्यांना १०० ते ११० रुपये किलोने सोयाबीन बियाणे विकत घेणे भाग पडले आहे.

परंतु यावर्षी पाऊस वेळेवर आल्याने पेरण्या वेळेवर झालेल्या आहेत. पिकांची उगवण सुद्धा चांगली झाली आहे. मात्र असे असतानाच मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतीत झाला आहे. परिसरात शेती करणे हाच मुख्य व्यवसाय असून वर्षभर शेतीचे कामे करून ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. सध्या महागाईच्या काळात शेती करणे परवडत नाही, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. मात्र तरी सुद्धा काही शेतकरी आपली शेती ठोका व बटईने देतात तर अनेक शेतकरी स्वतःच मेहनत घेत शेतीचे कामे करीत असतात.

पेरणीचा खर्च वाढला

यावर्षी पेरणीचा वाढलेला खर्च तसेच बी-बियाणे व रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलेले आहे. असे असताना सुद्धा शेतकरी बांधवांनी मोठ्या हिमतीने पेरणी केलेली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाऊस गायब झाल्याने पाण्याअभावी पिके सुकण्याची वेळ आली आहे.