शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पैनगंगेच्या पुराने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

बुलडाणा तालुक्यात झालेल्या अतिपावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. गिरडा ...

बुलडाणा तालुक्यात झालेल्या अतिपावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. गिरडा ते अटकळ या गावाला जोडणारा पूल देखील क्षतीग्रस्त झाला आहे. या नुकसानाची माहिती घेतल्यानंतर आ. श्वेता महाले यांच्या सूचनेवरून भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी आदी अधिकारी वर्ग समवेत नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाडळी, गिरडा, इजलापूर, गोंधनखेड, मढ, अटकळ, देवपूर आदी भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाने तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, गिरडा ते अटकळ या गावाला जोडणारा क्षतीग्रस्त पुलाबाबत जि. प. बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सूचना देऊन तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ॲड .देशमुख यांनी यावेळी केली. यावेळी संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा किसान मोर्चाचे आनंदा डुकरे, संजय झुंबड, कुंदन गायकवाड, संतोष पाटील, रमेश भोपळे तसेच स्थानिक भाजपा शाखा अध्यक्ष व सहकारी उपस्थित होते.

पीक विमा संदर्भातील कागदपत्रे तातडीने द्या!

शेतीच्या नुकसान भरपाईतून काही प्रमाणात पीकविम्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यासाठी नुकसानाची माहिती ७२ तासांच्या आत देणे गरजेचे ठरते. त्यानुसार नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असल्यास ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती अर्ज करून तसेच नुकसान झालेल्या शेताचे फोटो जोडून कृषी अधिकारी व विमा कंपनीला सादर करावे, असे आवाहन या पाहणी दरम्यान ॲड. सुनील देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले.