शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेगाव तालुक्यात पीक नुकसानाचा सर्व्हे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:54 IST

शेगाव तालुक्यात पीक नुकसानीचा १०० टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे.

शेगाव : परतीच्या पावसाने तालुक्यातील एकूण ४४९३८ पैकी ४०६६८ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी ३८०७८ हेक्टर क्षेत्र बाधित ठरले असून ३५७६५ शेतकरी मदतीसाठी पात्र झाले आहेत. त्यादृष्टीने पात्र शेतकर्याच्या नावाच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी शासकीय यंत्रणेला दिले होते. त्यानुसार शेगाव तालुक्यात पीक नुकसानीचा १०० टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे. पावसामुळे यामध्ये सर्वच शेतकºयांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यामुळे सरसकट नुकसान दाखविण्यात आले आहे. सोयाबीन, कापूस, मका आदी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी मोहीम स्वरूपात पूर्ण केली, विमा कंपनीने अत्यंत जबाबदारीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी. सोयाबीनच्या सुड्या, पेंड्या अथवा गंजी मारून नुकसान झालेल्या पिकालाही विम्याची मदत द्यावी, तसेच एकही शेतकरी पंचनामा व लाभापासून वंचित राहता कामा नये, व सरसकट नुकसान असल्याने कुठल्याही शेतकºयाला वंचित ठेवण्यात येणार नाही असेही ना.डॉ.कुटे यांनी सांगितले होते, त्यानुसार प्रशासकीय यंत्रणेने पंचनामे करण्याचे काम गतीने केले. (शहर प्रतिनिधी)

शेगाव तालुक्यातील सव्हेर्चे काम १०० टक्के पूर्ण केले आहे. मदतीस पात्र शेतकºयाच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे.- शिल्पाताई बोबडे,तहसिलदार ,शेगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावagricultureशेती