शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा मुदतवाढ ठरणार ‘फार्स’

By admin | Updated: August 3, 2015 01:35 IST

ग्राम पंचायत निवडणुकीत कर्मचारी व्यस्त असल्याने मुदतवाढीचा उपयोग शुन्य.

सुहास वाघमारे / नांदुरा (जि. बुलडाणा): शासनाने १ ऑगस्टच्या संध्याकाळी परिपत्रक काढून ७ ऑगस्ट पर्यंत पिक विम्याला मुदतवाढ दिली. मात्र २ ऑगस्टचा रविवार असून सोमवार तीन ऑगस्टपासून सहा ऑगस्टपर्यंंत कर्मचारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रीयेत राहणार आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांना शेतकर्‍यांना उपलब्ध होवून प्रमाणपत्र देणे शक्य नाही. सदर मुदतवाढ फार्स ठरणार असल्याची चर्चा आहे. तथापि, शासनाने ३१ ऑगस्ट पर्यंत पिक विम्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.यावर्षी सुरवातीला जोरदार बरसणार्‍या पावसाने दडी मारल्याने काही भागात दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढवले व काहीच्या तर अद्यापही पेरण्याच बाकी आहेत. त्यामुळे पिक विमा काढण्याची ३१ जुलैची मुदत झाल्यानंतरही शेतकरी पिक विमा काढूच शकले नाही. त्यामुळे पिक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकर्‍यांची होती. आधी नकाराची भाषा बोलणार्‍या राज्य शासनाने १ ऑगस्टच्या संध्याकाळी कृषी विभागाचे अवर सचिव श.बा.पावसकर यांनी परिपत्रक काढून ७ ऑगस्ट पर्यंंत मुदत वाढ दिली आहे. या परिपत्रकात ज्या अटी दिल्या आहेत. त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक नुसार पेरणी हि १ ते ७ ऑगस्ट दरम्यानचीच असल्यास सदर मुदतवाढ लागु होणार आहे.प्रत्यक्षात मागील आठ दिवसांपासून पेरण्या खोळंबल्याने कोणीही या कालावधीत पेरणी करने शक्य नाही. मुद्दा क्रमांक दोन नुसार शेतकर्‍यांनी पिक विमा प्रस्तावावर पिकाची स्थिती सर्वसाधरणपणे चांगली असल्याची करणे आवश्यक आहे. हे सुध्दा पेरण्या खोळंबल्याने शक्य नाही. मुद्दा क्रमांक तीन नुसार शेतकर्‍यांना सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र म्हणजेच तलाठी व कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असून बॅकांनी ते सांभाळून ठेवण्याची सुचना आहे. पावसाने दडी मारल्याने व दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावले आहे. काही भागात आजही पेरण्या बाकी अशा परिस्थितीत राज्य शासनाने कर्जमाफी व दुबार पेरणीसाठी मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांची होती; मात्र शासनाने शेतकर्‍यांना 'भोपळा' दिला.