शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

पीक विमा मुदतवाढ ठरणार ‘फार्स’

By admin | Updated: August 3, 2015 01:35 IST

ग्राम पंचायत निवडणुकीत कर्मचारी व्यस्त असल्याने मुदतवाढीचा उपयोग शुन्य.

सुहास वाघमारे / नांदुरा (जि. बुलडाणा): शासनाने १ ऑगस्टच्या संध्याकाळी परिपत्रक काढून ७ ऑगस्ट पर्यंत पिक विम्याला मुदतवाढ दिली. मात्र २ ऑगस्टचा रविवार असून सोमवार तीन ऑगस्टपासून सहा ऑगस्टपर्यंंत कर्मचारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रीयेत राहणार आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांना शेतकर्‍यांना उपलब्ध होवून प्रमाणपत्र देणे शक्य नाही. सदर मुदतवाढ फार्स ठरणार असल्याची चर्चा आहे. तथापि, शासनाने ३१ ऑगस्ट पर्यंत पिक विम्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.यावर्षी सुरवातीला जोरदार बरसणार्‍या पावसाने दडी मारल्याने काही भागात दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढवले व काहीच्या तर अद्यापही पेरण्याच बाकी आहेत. त्यामुळे पिक विमा काढण्याची ३१ जुलैची मुदत झाल्यानंतरही शेतकरी पिक विमा काढूच शकले नाही. त्यामुळे पिक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकर्‍यांची होती. आधी नकाराची भाषा बोलणार्‍या राज्य शासनाने १ ऑगस्टच्या संध्याकाळी कृषी विभागाचे अवर सचिव श.बा.पावसकर यांनी परिपत्रक काढून ७ ऑगस्ट पर्यंंत मुदत वाढ दिली आहे. या परिपत्रकात ज्या अटी दिल्या आहेत. त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक नुसार पेरणी हि १ ते ७ ऑगस्ट दरम्यानचीच असल्यास सदर मुदतवाढ लागु होणार आहे.प्रत्यक्षात मागील आठ दिवसांपासून पेरण्या खोळंबल्याने कोणीही या कालावधीत पेरणी करने शक्य नाही. मुद्दा क्रमांक दोन नुसार शेतकर्‍यांनी पिक विमा प्रस्तावावर पिकाची स्थिती सर्वसाधरणपणे चांगली असल्याची करणे आवश्यक आहे. हे सुध्दा पेरण्या खोळंबल्याने शक्य नाही. मुद्दा क्रमांक तीन नुसार शेतकर्‍यांना सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र म्हणजेच तलाठी व कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असून बॅकांनी ते सांभाळून ठेवण्याची सुचना आहे. पावसाने दडी मारल्याने व दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावले आहे. काही भागात आजही पेरण्या बाकी अशा परिस्थितीत राज्य शासनाने कर्जमाफी व दुबार पेरणीसाठी मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांची होती; मात्र शासनाने शेतकर्‍यांना 'भोपळा' दिला.