शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दीड लाखापैकी ४.५0 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 02:39 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील सात हजार शेतक-यांनी उतरविला विमा.

बुलडाणा, दि. १८- जिल्ह्यात १ लाख ४५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. या पिकांना सुरक्षेचे कवच मिळावे म्हणून रब्बी हंगाम २0१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हय़ात राबविण्यात आली. १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ३५७ हेक्टर रब्बी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात साडेसात हजार शेतकर्‍यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.जिल्ह्यात सप्टेंबर २0१६ पासून रब्बीची पेरणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर संभाव्य नैसर्गिक आपत्ती, कीड व अळींचा हल्ला, उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान आदी बाबींमध्ये रब्बी पिकांना सुरक्षा मिळावी, तसेच शेतकर्‍यांना त्याची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टिकोणातून जिल्ह्यात पीक विमा योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर घोषित करण्यात आली आहे;मात्र शेतकर्‍यांकडून योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे १0 जानेवारी २0१७ पर्यंत पुन्हा योजनेला मुदतवाढ देण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून १८ जानेवारी रोजी प्राप्त अहवालानुसार, पीक विमा योजनेत सहभाग नोंदवित जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ७ हजार ५४२ शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत ७ लाख ७२ हजार ३३८ रुपयांचा हप्ता भरला आहे. यातून ४ हजार ३५७ हेक्टर रब्बी क्षेत्र सुरक्षित झाले आहे. शेतकर्‍यांनी भरला ७ लाख ७२ हजार हप्ताप्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २0१६-१७ मध्ये जिल्हय़ामध्ये राबविण्याकरिता नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.मंडळ कार्यालय, मुंबई कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. १८ जानेवारी रोजी प्राप्त माहितीनुसार, पीक विमा योजनेत शेतकर्‍यांनी ७ लाख ७२ हजार ३३८ रुपयांचा हप्ता भरला आहे. यात बुलडाणा उपविभागात ४ लाख २ हजार ९९५ रुपये, खामगाव उपविभागात १ लाख ६१ हजार ८३0 रुपये आणि मेहकर उपविभागात २ लाख ७ हजार ५१२ रुपये भरले आहेत.बुलडाणा उपविभागात चांगला प्रतिसाद जिल्ह्यातील ७ हजार ५४२ शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला असून, यात बुलडाणा विभागातील बुलडाणा, चिखली, मोताळा व मलकापूर या चार तालुक्यातून ४ हजार ३६९ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला, तर खामगाव विभागात १ हजार १४२ तर मेहकर विभागात २ हजार ३१ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.