शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखापैकी ४.५0 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 02:39 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील सात हजार शेतक-यांनी उतरविला विमा.

बुलडाणा, दि. १८- जिल्ह्यात १ लाख ४५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. या पिकांना सुरक्षेचे कवच मिळावे म्हणून रब्बी हंगाम २0१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हय़ात राबविण्यात आली. १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ३५७ हेक्टर रब्बी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात साडेसात हजार शेतकर्‍यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.जिल्ह्यात सप्टेंबर २0१६ पासून रब्बीची पेरणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर संभाव्य नैसर्गिक आपत्ती, कीड व अळींचा हल्ला, उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान आदी बाबींमध्ये रब्बी पिकांना सुरक्षा मिळावी, तसेच शेतकर्‍यांना त्याची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टिकोणातून जिल्ह्यात पीक विमा योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर घोषित करण्यात आली आहे;मात्र शेतकर्‍यांकडून योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे १0 जानेवारी २0१७ पर्यंत पुन्हा योजनेला मुदतवाढ देण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून १८ जानेवारी रोजी प्राप्त अहवालानुसार, पीक विमा योजनेत सहभाग नोंदवित जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ७ हजार ५४२ शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत ७ लाख ७२ हजार ३३८ रुपयांचा हप्ता भरला आहे. यातून ४ हजार ३५७ हेक्टर रब्बी क्षेत्र सुरक्षित झाले आहे. शेतकर्‍यांनी भरला ७ लाख ७२ हजार हप्ताप्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २0१६-१७ मध्ये जिल्हय़ामध्ये राबविण्याकरिता नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.मंडळ कार्यालय, मुंबई कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. १८ जानेवारी रोजी प्राप्त माहितीनुसार, पीक विमा योजनेत शेतकर्‍यांनी ७ लाख ७२ हजार ३३८ रुपयांचा हप्ता भरला आहे. यात बुलडाणा उपविभागात ४ लाख २ हजार ९९५ रुपये, खामगाव उपविभागात १ लाख ६१ हजार ८३0 रुपये आणि मेहकर उपविभागात २ लाख ७ हजार ५१२ रुपये भरले आहेत.बुलडाणा उपविभागात चांगला प्रतिसाद जिल्ह्यातील ७ हजार ५४२ शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला असून, यात बुलडाणा विभागातील बुलडाणा, चिखली, मोताळा व मलकापूर या चार तालुक्यातून ४ हजार ३६९ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला, तर खामगाव विभागात १ हजार १४२ तर मेहकर विभागात २ हजार ३१ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.