शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पेनटाकळीतून पाझरणाऱ्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पातील पाझरणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यावर ...

मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पातील पाझरणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आ. तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात आ. रायमुलकर यांनी म्हटले की, पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून होत असलेल्या पाझरामुळे परिसरातील शेतीचे व पिकांचे नुकसान होत आहे.नुकताच चौथ्या कि.मी.वरील कालवा फुटून ६५ च्यावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकल्पाचे सर्व कालवे खराब झाले असून, वारंवार सूचना देऊनही उपाययोजना करण्यात आली नाही. मुख्य कालव्यातून होणारा पाझर कमी करण्यासाठी सिमेंट काँक्रीटमध्ये अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतरही पाझरणारे पाणी नाल्यापर्यंत जाण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे. यासोबतच चरांची खोली वाढवून पाण्याचा निचरा करावा. तसेच केलेल्या चरांची देखभाल व्हावी व सर्व कालव्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. या उपाययोजना तातडीने होणे आवश्यक आहे. पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सहमतीने सचिवस्तरीय उपसमितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, अशी मागणी आ. संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन केली आहे. याविषयीचे निवेदन बुधवारी मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिले असून, त्यांनी पुढील आठवड्यात खासदार, आमदार व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करतो, असे आश्वासन दिले आहे.